
पुणे : केंद्रातले सरकार (Central Government) राज्याशी सुडबुद्धीने वागत आहे. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीचाही कसा वापर केला जातो, हे संपुर्ण राज्याला माहिती आहे. पण राज्य सरकारला कितीही त्रास दिला तरी हे महाविकासआघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) 5 वर्ष टिकणारच, आणि आपल्याला त्रास देणाऱ्यांना आपण पुरून उरणार, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase patil) यांनी व्यक्त केला आहे.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegan) तालुक्यातील कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते.
काय म्हणाले दिलीप वळसे-पाटील?
राज्यात आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना मराठा, ओबीसी, धनगर, अल्पसंख्याक समाजांची आरक्षणाची मागणी आहे. या मागणीला राज्यातील प्रत्येक पक्षांचा नेत्यांचा पाठिंबा आहे, पण महाविकास आघाडी सरकारला या समाजांना आरक्षण द्यायचे नाही, असे भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते राज्यातील जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी यावेळी बोलताना केला.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर जिंकायच्या आहेत, पण आपल्याला विरोधकांची भीती नाही तर आपल्यातीलच काही नाराजांची भीती आहे. ज्याप्रमाणे विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला मतदान केलं, तसंच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जसे राष्ट्रवादीला मतदान झाले पाहिजे. निवडून आलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या भागातील जनतेसाठी चांगली कामं केली पाहिजेत, असा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तसेच यावेळी त्यांनी आपल्या जिल्हा परिषद गटातल्या प्रमुखांना निवडणूकांच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सुचनाही केल्या. निवडणुका जाहीर होण्याआधीच आपापल्या मतदार संघातील लोकांमध्ये जाऊन त्यांचं म्हणणं समजून घ्या, त्यांच्या अडचणी, समस्या समजावून घ्या. सरकार आणि राष्ट्रवादीची मराठा आरक्षणा संदर्भातील भूमिका समजून सांगा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच, आपल्याकडे राज्यातील महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आहे, त्यामुळे मला स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मला जास्त वेळ देता येणार नाही. राज्यातील घडामोंडीकडे पण लक्ष द्यावं आणि निवडणूकांच्या प्रचाराला पण यावं, अशी मागणी असेल तर जमणार नाही. पण आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विविध संस्थांवर तरुणांना संधी देणार आहे. पण त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात जाऊन लोकांच्या भेटीगाठी घ्यायला हव्यात असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.