Governor Appointed MLA: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसंदर्भात हायकोर्टाचा राज्य सरकारला महत्वपूर्ण आदेश...

High Court On State Government: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी यादी दिली आहे, त्यावर सर्वप्रथम निर्णय व्हावा, त्यानंतरच इतर याद्यांचा विचार केला जावा,
Mumbai High Court
Mumbai High CourtSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसंदर्भात उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने राज्य सरकारला २१ आगस्ट रोजी आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणीही २१ ऑगस्टलाच होणार आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांचा विषय पुन्हा प्रलंबित राहिली आहे.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसंदर्भात महाविकास आघाडीचे सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जी यादी दिली आहे, त्यावर सर्वप्रथम निर्णय व्हावा, त्यानंतरच इतर याद्यांचा विचार केला जावा, या मागणीसाठी सुनील मोदी यांची उच्च न्यायालयात (High Court) याचिक दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. त्यात पुढील २१ ऑगस्टची तारीख देण्यात आलेली आहे.

Mumbai High Court
Leader of Opposition: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाणार; विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित होणार

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जणांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली हेाती. मात्र, कोश्यारी यांनी त्याला मंजुरी दिली नव्हती. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे यांनी दिलेली यादी रद्द करून नवी यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविली हेाती. मात्र, त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या सुनावणीत १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठविण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी होणे बाकी होते. उच्च न्यायालयात आज त्यावर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने राज्य सरकारला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी होणार असून त्याच वेळी राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करायाची आहे.

Mumbai High Court
Uddhav Thackeray Statement: दिल्लीला पाणी पाजण्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे; नाही तर....: उद्धव ठाकरेंचे सूचक व्यक्तव्य

महाविकास आघाडी सरकारच्या वेळी सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मंजुरीचा होता. कारण, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या १२ जणांच्या नावाला कोश्यारी यांनी शेवटपर्यंत मंजुरीच दिली नव्हती. तसेच, मुख्यमंत्री ठाकरे यांनी खरमरीत भाषेत राज्यपालांना पत्रही लिहिले होते. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी शेवटपर्यंत ठाकरे यांनी पाठविलेल्या १२ आमदारांच्या नावाला मंजुरी दिली नव्हती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com