
विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकारकडून निवडणुकीनंतर शेतकरी कर्जमाफी करण्यात येईल, असा आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर सातत्याने कर्जमाफी कधी होणार याबाबत प्रश्न सरकारला विचारण्यात येत आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने दिलेले कोणतेही वचन मागे घेणार नाही" आणि "योग्य वेळी योग्य निर्णय" होईल असे सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला .
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांना एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने ठाकरे गटाला जेवणाचं निमंत्रण द्याल का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. तसेच त्यांनी जेवणाचं निमंत्रण देखील ठाकरे गटाला दिलं. त्यावर त्याच वाहिनीच्या पत्रकाराने ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांना निमंत्रण स्वीकारणार का? असा प्रश्न विचारला असता, वैयक्तिक मैत्रीमुळे माणुसकीमुळे आपण निमंत्रण स्वीकारणार, असं ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.