राजकीय समीकरणांना वेग! पवार, ठाकरे अन् फडणवीसांनी हाती घेतली सूत्रे

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाविका आघाडी आणि भाजपमध्ये (BJP) रस्सी खेच सुरु आहे
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) उद्या (ता.१०) मतदान होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी राजकीय समीकरणांना वेग आला आहे. भाजपने (BJP) आपला तिसरा उमेदवार आणि शिवसेनेने (Shivsena) दुसरा उमेदवार निवडून आण्यासाठी जोर लावला आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना एक-एक मत महत्त्वाचे आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

यासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत हॅाटेल ताजमध्ये सुरु असलेल्या पक्षाच्या बैठकीला हजेरी लावत त्यांनी निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. कोणाताही दगाफटका होऊ नये यासाठी राज्यातील सर्वोच्च नेते स्वत: मैदानात उतरल्यामुळे राजकारण चांगलेच ठवळून निघाले आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
राज्यसभेसाठी 'मविआ'ची सावध पावलं; डमी मतपत्रिकेतुन आमदारांना मार्गदर्शन

भाजपची रणनीतीसाठी हॅाटेल ताजमध्ये बैठक सुरु आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर बौलावले आहे. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. तसेच त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा केली आहे. भाजप आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे.

महाविकास आघाडीकडून आपल्या घटक पक्षांना तसेच मित्र पक्षांना आणि अपक्ष आमदारांना प्रत्यक्ष भेटून चाचपणी केली जात आहे. त्यातच महाविकास आघाडीची दोन मते कमी झाली आहेत. यामुळे मतांचा कोटा कमी होणार आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या चाव्या आता बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेल्या आहेत. ठाकूर यांचे तीन आमदार असून, त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत.

ठाकूर यांची मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. खुद्द शरद पवार यांनीही ठाकूर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. त्याच बरोबर आज उद्धव ठाकरे यांनीही ठाकूर यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. याचबरोबर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनीही ठाकूर यांची भेट घेतली होती. यानंतर शिवसेनेचे नेतेही ठाकूर यांना भेटले होते.

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
एक मंत्रीही भेटायला आला नाही! निवडणुकीच्या 24 तास आधी ठाकूरांनी टाकला बॉम्ब

देशमुख आणि मलिक यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतांचा कोटा कमी झाली आहे. या आधी ४१. १४ चा मतांचा कोटा होता. आता ४०. ७१ चा मतांचा कोटा लागणार आहे. त्यामुळे भाजपला १ मता फायदा होणार आहे. या आधी निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज होती. आता विजयी उमेदवाराचा कोटा बदलल्याने त्यासाठी 41 मतांची गरज लागणार आहे. यामुळे शिवसेनाला १ मलाताचा तोटा सहन करावा लागणार आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या आणि भाजपच्या तिसऱ्या उमेदवारासाठी एक-एक मत महत्त्वाचे असताना महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसला आहे. यामुळे मतांची जुळवा जुळव सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com