आंदोलन लांबू नये -फाटे फुटू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांचे झटपट निर्णय 

अखिल भारतीय किसान सभेने काढलेल्या अभुतपूर्व मोर्चाला भाजपवगळता सर्व राजकीय पक्षांचा सक्रीय पाठिंबा मिळू लागल्याने या आंदोलनाचा विरोधकांनी राजकीय फायदा उठवू नये याची खबरदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत आंदोलनकर्त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या . त्यामुळे आंदोलकांचे समाधान झाले आणि सरकारचेही !
cm-&-red-storm
cm-&-red-storm

मुंबई  : अखिल भारतीय किसान सभेने काढलेल्या अभुतपूर्व मोर्चाला भाजपवगळता सर्व राजकीय पक्षांचा सक्रीय पाठिंबा मिळू लागल्याने या आंदोलनाचा विरोधकांनी राजकीय फायदा उठवू नये याची खबरदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत आंदोलनकर्त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या . त्यामुळे आंदोलकांचे समाधान झाले आणि सरकारचेही ! 

गेल्यावर्षीचा शेतकरी संप नीट हाताळला न गेल्याने सरकारचीच कोंडी झाली होती . विरोधकांनी शेतकरी संपाट उतरून अनेक फाटे फोडले होते .  त्यापार्श्वभूमीवर घाईघाईत कर्जमाफीचा निर्णय घेण्याची वेळ सरकारवर आली होती.  गेल्यावेळेसच्या  अनुभवातून योग्य तो धडा घेऊन  हे आंदोलन लांबले जावू नये याची काळजी सरकारने घेतली. त्यामुळे ना अन्य प्रस्थापित शेतकरी नेत्यांना ना राष्ट्रवादी काँग्रेसला या आंदोलनावर आरूढ होऊन सरकारची कोंडी करण्याची संधी मिळाली नाही . 

आंदोलन फार काळ चालले की ते चिघळते आणि त्याला अधिक फाटे फुटत जात असल्याचा अनुभव शेतकरी संपातून सरकारला यापूर्वीच आला होता. लेखी आश्‍वासनांशिवाय मुंबईतून निघायचे नाही असा निर्धार किसान सभेने केला असल्याने त्यांना लेखी हमी देण्याची तयारी सुरवातीलाच सरकारने दिली. प्रशासकीय व्यवस्थापन सुरळीत व्हावे आणि त्यातील त्रुटी कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असतेच, त्यामुळे बऱ्याच अटी चर्चेच्या पहिल्याच टप्प्यात मंजूर झाल्या. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन देत आंदोलन आजच्या आजच मागे घेतले जाईल याची खबरदारी राज्य सरकारने घेतली.

गेल्यावर्षी देशात पहिल्यांदाच झालेला ऐतिहासिक शेतकरी संप अखेरीस चिघळंत गेला होता. त्याचा ताण अखेरीस इतका वाढला की 34 हजार कोटीच्या कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारला करावी लागली होती. त्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्रभावीपणे हाताळणाऱ्या नेतृत्वाचा अभाव भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये जाणवत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठल्याच मागण्यांवर फार अडून राहिले नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या विश्‍वासातले जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे कालपासूनच आंदोलनकर्त्यांच्या संपर्कात होते. सोमय्या मैदानातून रात्री दोनवाजता निघालेल्या शेतकऱ्यांबरोबर ते पहाटेपर्यंत चालले. आझाद मैदानातून हे मोर्चेकरी आजच्या आज माघारी जातील याची काळजी घेत राज्य सरकारने त्यांच्या परतीसाठी दोन रेल्वे गाड्या देखील सोडल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com