लक्ष्मण सवदी यांच्या भविष्याविषयी चर्चा; उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची सुरक्षित राहणार का ?

राजकारणाच्या दृष्टीने बेळगाव जिल्हा आघाडीवर आहे. एकाच जिल्ह्यात सहा मंत्रिपदे मिळाल्यास अन्य जिल्ह्यांतील नेते नाराज होणार आहेत. उमेश कत्ती हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. आमदार महेश कुमठळ्ळी, श्रीमंत पाटील या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यांना डावलल्यास भविष्यात नवे संकट उभे राहणार आहे. चिक्कोडी उपविभागात मंत्रिपदे गेल्यास बेळगाव भागातील आमदारांची नाराजी ओढविणार आहे. त्यामुळे भविष्यात अनेक प्रश्‍न उदभवणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याकडून आश्‍वासनांचे पालन होणार का? हा एक मोठा प्रश्‍न आहे.
लक्ष्मण सवदी यांच्या भविष्याविषयी चर्चा; उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची सुरक्षित राहणार का ?
Published on
Updated on

अथणी : राज्यपातळीवरील नेत्यांच्या आदेशानुसार अथणी, कागवाड आणि गोकाक पोटनिवडणुकीत भाजपच्या तीनही उमेदवारांना निवडून आणण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे योगदान मोलाचे आहे. बेळगाव जिल्ह्यास एकूण पाच जणांना मंत्रिपद मिळणार आहेत. त्यामध्ये लक्ष्मण सवदी यांची उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची सुरक्षित राहणार का ? या विषयी चर्चा सुरू झाली आहे. 
सन 2018 मधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची राज्यात सत्ता येण्यासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व बेळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा सिंहाचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात आले. या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने भरघोस यश मिळविल्यामुळे बेळगाव जिल्ह्यास एकूण सहा मंत्रिपदे मिळणार का ? याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या आश्‍वासनानुसार अथणी आणि कागवाड मतदारसंघात तीन मंत्रिपदे देणार का ? हा देखील औत्सुक्‍याचा विषय आहे.

राजकारणाच्या दृष्टीने बेळगाव जिल्हा आघाडीवर आहे. एकाच जिल्ह्यात सहा मंत्रिपदे मिळाल्यास अन्य जिल्ह्यांतील नेते नाराज होणार आहेत. उमेश कत्ती हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. आमदार महेश कुमठळ्ळी, श्रीमंत पाटील या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यांना डावलल्यास भविष्यात नवे संकट उभे राहणार आहे. चिक्कोडी उपविभागात मंत्रिपदे गेल्यास बेळगाव भागातील आमदारांची नाराजी ओढविणार आहे. त्यामुळे भविष्यात अनेक प्रश्‍न उदभवणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याकडून आश्‍वासनांचे पालन होणार का? हा एक मोठा प्रश्‍न आहे. 

जिल्ह्यास दोन उपमुख्यमंत्री मिळणार का ? 
पोटनिवडणुकीनंतर रमेश जारकिहोळी यांना उपमुख्यमंत्री व पाटबंधारे खात्याचे मंत्रिपद देण्याचे जाहीर झाले आहे. या आधीच लक्ष्मण सवदी यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यास दोन उपमुख्यमंत्री मिळणार का? याचीही कसोटी लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com