नेहरूंचा अहंकार, इंदिरांची दडपशाही आणि न संपणारी घराणेशाही : मोदींचे काॅंग्रेसला तडाखे

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची संधी मोदींनी साधली
Narendra Modi
Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंडित नेहरूंना (Narendra Modi about Pandit Nehru) आपल्या आंतरराष्ट्रीय छबीची इतकी चिंता होती की त्यांनी ती जपण्यासाठी गोव्यात सैन्य पाठविले नाही. नेगरूंच्या या वागण्याने स्वातंत्र्यानंतर १५ वर्षे गोवा पारतंत्र्यातच राहिला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi criticizes congress in parliament) यांनी आज राज्यसभेत केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना मोदींनी कॉंग्रेसवर शहरी नक्षलवाद्यांनी कब्जा केल्याने देशाला धोका निर्माण झाल्याचाही आरोप केला.

‘एकीकडे कॉंग्रेसवर, गांधी-नेहरू घराण्यावर अत्यंत बोचरी टीका व दुसरीकडे प्रादेशिक पक्षनेत्यांची स्तुती‘ असे दुहेरी अस्त्र त्यांनी प्रभावीपणे वापरले. मोदींची धारदार टीका सुरू होताच अस्वस्थ होऊन कॉंग्रेसने सभात्याग केला. यूपीएचे घटकपक्ष त्यात सामील झाले नाहीत.

Narendra Modi
Video : एका परिवारामुळे काँग्रेसमध्ये बुद्धीमत्तेची हानी - नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी राज्यसभेत ११.३४ ते १२.५६ पर्यंत भाषण केले. त्यांनी आजही कॉंग्रेसवरच घणाघाती टीकेचा भर ठेवला. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेल्या गोव्याचेही उदाहरण त्यांनी दिले. मुक्तीसंग्रामातील सत्याग्रहींना नेहरू सरकारने मदत करणे तर दूर; पण स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी नेहरूंनी अवलंबलेल्या धोरमुळेच गोवा दीर्घकाळ गुलामीत राहिला. सत्याग्रही जेव्हा गोळ्या झेलत होते तेव्हा नेहरूंनी १५ आॅगस्ट १९५५ रोजी लाल किल्ल्यावरून गोव्यात सैन्य पाठवणार नाही असे सांगताना जे लोक तेथे जात आहेत त्यांना ते लखलाभ (मबारक) होवो, अशी अत्यंत अहंंकारी भाषा वापरली. नेहरूंनी गोव्याला असाहाय्य सोडले होते.

घराणेशाही पक्षांचा मोठा धोका लोकशाहीला आहे. कारण एकाद्या पक्षात घराणेच मोठे होते तेव्हा पहिला बळी गुणवत्तेचा जातो लोकशाहीची व्याख्याने देणाऱया कॉंग्रेसवर याची सर्वाधिक जबाबदारी आहे. देशाची लोकशाही तुमच्या मेहेरबानीवर कायम राहिलेली नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Narendra Modi
Video: काॅंग्रेस नसती तर लोकशाही ही घराणेशाहीमुक्त झाली असती; नरेंद्र मोदी

कॉंग्रेस राहिला तर काय काय होईल, हे गांधींना माहिती होते म्हणूनच ते कॉंग्रेस विसर्जित करू इच्छित होते, असे सांगून मोदी म्हणाले की कोरोनाकाळात सर्वपक्षीय बैठकीवर या पक्षाने बहिष्कार टाकलाच. पण इतर पक्षांनाही जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र शरदरावांनी (शरद पवार) त्याला नकार दिला. जरा त्यांच्याकडून तरी काही शिका, असा चिमटा मोदींनी काढला. महागाई व बेरोजगारीवरून झालेल्या टीकेवर मोदींनी कोरना काळात आंतरराष्ट्रीय संस्थांची भारतीय अर्थव्वस्थेबाबतची सकारात्मक आकडेवारी व जागतिक पातळीवरील चित्र यांचे उदाहरण दिले. उच्च विकास व मध्यम महागाई हा भारताचा प्रवास असून जगात अनेक देशांत याच्या उलट होत आहे. अमेरिका, ब्रिटनही ऐतिहासिक महागाई स्फोटापासून वाटले नाहीत तेव्हा भारताचा महागाई दर ५ टक्क्यांच्या आत राहिलेला आहे. पराजयाने आलेली व्यक्तिगत निराशा देशावर लादू नका व भारताचे निराशाजनक चित्र रंगवू नका, असा सल्ला त्यांनी काॅंग्रेसला दिला.

कोरोना महामारी जोवर आहे तोवर सरकार गरीबांना मदत करत राहील, अशी ग्वाही देऊन ते म्हणाले की महामारीच्या या घोर संकटकाळात काळात भारताच्या प्रयत्नांची साऱया जगाने स्तुती केली. तुम्ही त्याचे यश घेण्याचा तरी प्रयत्न करायचा. आता हेही तुम्हाला शिकवावे लागेल का?

Narendra Modi
मोदी बोलले ते सत्यच! : `सागरा प्राण` मुळे हृदयनाथ यांची नोकरी गेली होती..

मोदी म्हणाले

- इतिहास बदलण्याचा आरोप आमच्यावर करणाऱयांची स्मरणशक्ती आम्ही दुरूस्त करू इच्छितो. भारत १९४७ मद्येच अस्तित्वात आला अशा भ्रमात काही लोक आहेत. आम्ही इतिहास बदलत नाही तर इतिहासाचा विस्तार करत आहोत. जे १०० वर्षांच्या इतिहास सांगतात त्यांना आम्ही २०० वर्षांचा इतिहास सांगतो. जे २०० वर्षांचा इतिहास सांगतात त्यांना ३०० वर्षांचा व त्यापलीकडचाही इतिहास सांगतो. जेव्हा ३००-३५० वर्षांचा इतिहास उलगडेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येणारच. १८५७ च्या संग्रामात आदिवासींचे योगदान व इतर कित्येक गोष्टी सांगितल्याच जात नाहीत.

- `तीन तलाक`ची कुप्रथा आम्ही बंद केली. त्यामुळे केवळ मुलींनाच नव्हे तर कोणाचा तरी बाप-भाऊ असलेल्या मुसलमान पुरूषांनाही न्याय मिळाला आहे.

- काश्मीरात कलम ३७० हटविल्याने तेथील माताभगिनींना अधिकार मिळाला.

- आंध्र प्रदेशाचे विभाजन करताना कॉंग्रेसच्या अहंकारामुळे संसदेतील माईक बंद केले गेले, मिरची स्प्रे उडविला गेला व आजही दोन्ही राज्यांतील कटुता कायम आहे.

- एका घराण्याच्या विरूद्ध गेल्याने मुलामसिंह यादव यांना अतोनात त्रास दिला गेला. टी अंजय्या, देवीलाल, चरणसिंह, प्रकाशसिंग बादल, रामकृष्ण हेगडे, करूणानिधी असा कित्येक मुख्यमंत्र्यांची सरकारे एका फटक्यात नष्ट केली गेली.

- घराण्यावर टीका केली म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केली गेली.

Narendra Modi
Video: 100 राज्य सरकारे कोणी बरखास्त केली ?, नरेंद्र मोदी यांचा सवाल

हृदयनाथ मंगेशकरांचा ‘तो‘ अपराध !

मोदीं म्हणाले की ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने सारा देश दुःखात आहे. त्यांचे कुटुंब गोव्याचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनाही (घराण्याने) कशी वागणूक दिली गेली हे मी सांगतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल मला ज्ञान पाजळले जाते. पण एका विशिष्ट घराण्याची मर्जी राखली नाही तर काय होते हे आम्ही सारे जाणतो. लताबाईंचे छोटे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना केवळ आठ दिवसांत रेडिओवरून काढून टाकण्यात आले होते. त्यांचा अपराध काय होता ? तर त्यांनी सावरकरांची एक कविता शब्दबद्ध केली होती. (सागरा प्राण तळमळला ही ती कविता) सावरकरांनी त्यांना, तुला तुरूंगात जायचे आहे का, असा इशारा दिला होता. केवळ ह्रुदयनाथच नव्हेत तर मजरूह सुलतानपुरींनी नेहरूंवर टीका केली म्हणून त्यांना वर्षभर तुरूंगात डांबण्यात आले. प्रसिध्द गायक किशोरकुमार यांना आणीबाणीत इंदिरा गांधींची बाजू न घेतल्याबद्दल मिशाण्यावर घेऊन त्रास दिला गेला.‘‘

Narendra Modi
महागाईसाठी नेहरूंनी कोरिया अन् अमेरिकेकडं बोट दाखवलं होतं : पंतप्रधान मोदी

कॉंग्रेस पक्ष नसता तर....

महात्मा गांधींच्या स्वप्नानुसार कॉंग्रेस तेव्हाच बरखास्त व्हायला हवा होता असे सांगून मोदींनी विरोधी पक्षनेते खर्गे यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की

कॉंग्रेस नसता तर -

- लोकशाही घराणेशाहीतून कधीच मुक्त झाली असती.

- भारताने विदेशी चष्म्याएवजी स्वदेशी संकल्पांसह वाटचाल केली असती.

- आणीबाणीचा कलंक देशावर लागला नसता.

- दशकानुदशके भ्रष्टाचारी शासन लादले गेले नसते.

- जातीयवाद व प्रांतवादाची दरी इतकी खोल झाली नसती.

- शिखांचा नरसंहार झाला नसता व पंजाब वर्षानुवर्षे दहशतवादाच्या आगीत जळला नसता.

- काश्मिरी पंडितांवर आपले राज्य सोडण्याची वेळ आली नसती.

- मुलींना तंदूरच्या भट्टीत जाळले गेले नसते.

- वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या मुलभूत गरजांसाठी सामान्यांना कित्येक वर्षए वाट पहावी लागली नसती.

---

अटलबिहारी वाजपेयी यांची मोदींनी उधृत केलेली कविता -

व्याप्त हुआ बर्बर अंधियारा

किंतु चीर कर तम की छाती

चमका हिंदुस्तान हमारा।

शत-शत आघातों को सहकर

जीवित हिंदुस्तान हमारा।

जग के मस्तक पर रोली सा

शोभित हिंदुस्तान हमारा।

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com