प्रकाश आंबेडकरांनी ऐक्‍याचा राजा व्हावे - रामदास आठवले

प्रकाश आंबेडकरांनी ऐक्‍याचा राजा व्हावे - रामदास आठवले

औरंगाबाद : समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून ऐक्‍य झाले पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांशिवाय ऐक्‍य शक्‍य नसल्याने मी दुय्यम स्थान स्वीकारत प्रकाश आंबेडकरांनी ऐक्‍याचा राजा व्हावं, मी सरदार आहेच. असे मत सामाजिक न्यायमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त रविवारी (ता. 14) सुभेदारी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
दलित समाज, कार्यकर्ते तसेच नेत्यांमध्ये ऐक्‍य होणे गरजेचे आहे. तळागाळातील ऐक्‍य होण्यासाठी गटबाजी न करता पुढे यावे लागेल. त्यासाठी फॉर्म्युला ठरवणे गरजेचे आहे. कोणासोबत जायचे हे मताधिक्‍याने ठरवले पाहीजे. माझे मंत्रिपद घालवण्यासाठी ऐक्‍याचा नारा दिला जात असेल तर तो मान्य होणार नसल्याचेही ते म्हणाले. 

कोरेगाव भिमा येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत त्यांनी या घटनेत दोषी असणाऱ्या तसेच दलित मराठ्यामध्ये फूट पाडण्यांवर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याशिवाय दलित कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेऊन कोंबिंग ऑपरेशन थांबविण्याची विनंतीही केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

मराठा व हिंदुत्ववादी संघटनांचा पुर्वनियोजित कट असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरांना माझा विरोध नाही. बंद होणारच होता. समाज आगोदरच रस्त्यावर उतरला होता. त्यात माझा पक्ष आघाडीवर होता. त्यामुळे मोठे होण्याचा किंवा बॅकफुटवर जाण्याचा प्रश्‍नच नाही. योग्यवेळी मला फ्रंटफुटवर कसे यायचे ते माहीत असल्याचा टोला आठवले यांनी लगावला. 

18 वर्ष संघर्ष केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा नामविस्तार झाला. त्यासाठी लाखो लोकांनी लढ्यात सहभाग दिला. अनेकांना शहिद व्हावे लागले अशा सर्वांना आदरांजली वाहतो असे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दर्जा सुधारावा येथिल विद्यार्थ्यांना सन्मान मिळावा यासाठी कुलगुरुंनी प्रयत्नशिल रहावे. विद्यापीठाला आवश्‍यक फंड आणि फॅकल्टीला मान्यता मिळुन देण्यासाठी मानवसंसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. 

शिवसेना भाजपातील सर्व आटलं 
शिवसेने सोबत माझे फाटले नसून शिवसेना भाजपातील सर्व आटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्र लढणार नाहीत. असा टोला आठवले यांनी आपल्या शैलीत लगावला. 

डीम युनिव्हर्सिटीतही मिळावी शिष्यवृत्ती 
गुणवत्तेच्या जोरावर ऍडमिशन मिळवलेल्या डीम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळावी यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. त्यांना शिष्यवृत्ती मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करु तर दोन हप्त्यात शिष्यवृत्ती वाटप केली जावी यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही आठवले यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com