नव्या उमेदीने कामाला लागा ; शिवछत्र परिवार पाठीशी असेल : विजयसिंह पंडित

जिल्हा परिषद सभापती निवडीत विजयसिंह पंडित यांच्या राजकीय डावपेचाने दोन्ही विरोधकांना चांगलेच घायाळ केले आहे. त्यामुळे त्यांचा व समर्थकांचा उत्साह दुणावला आहे.
 नव्या उमेदीने कामाला लागा ; शिवछत्र परिवार पाठीशी असेल : विजयसिंह पंडित

गेवराई : केवळ निवडणुकांपुरते लोकांसमोर जाण्याचा विचार शिवछत्र परिवाराने कधीही केला नाही. तुमच्या संकटाच्या आणि अडचणींच्या काळात हा शिवछत्र परिवार कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि यापुढेही राहील. आता रडत बसायचे नाही तर नव्या उमेदीने काम करा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. 

विधानसभा निवडणुकीत निकराची झुंज दिलेल्या विजयसिंह पंडित यांचा काठावर पराभव झाला. परंतु, जिल्हा परिषद सभापतींच्या निवडीत त्यांच्या राजकीय डावपेचाने दोन्ही विरोधकांना चांगलेच घायाळ केले. सभापती निवडीवेळी त्यांनी शिवसेनेच्या सदस्यांत फुट पाडून यशोदाबाई जाधव यांना आपल्या तंबूत घेतले आणि सभापतीच्या खुर्चीवरही बसविले. त्यामुळे इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या युद्धाजित पंडित यांचा चांगलाच हिरमोड झाला. 

ऐनवेळी झालेल्या घडमोडींनी कुठलाही पर्याय नसल्याने युद्धाजित पंडित यांना सभापतीपदासाठी दाखल केलेला अर्जही गुपचूप माघारी घ्यावा लागला. तर, अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीवेळीच त्यांनी आमदार लक्ष्मण पवार समर्थक जिल्हा परिषद सदस्या सविता मस्के यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीत घेत पवारांना अगोदरच शह दिला होता. विशेष म्हणजे कुठलीही चर्चा नसताना ऐनवेळी सविता मस्के यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळही पडली. त्यातही पंडित यांचीच खेळी होती. त्यामुळे दोन्ही विरोधकांना शह दिल्याने विजयसिंह पंडित व त्यांचे समर्थक अगदीच उत्साहात आहेत. दरम्यान, या नवनिर्वाचित सभापती यशोदाबाई जाधव व सविता मस्के यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. 

श्री. पंडित म्हणाले, राज्यात आपली सत्ता असून जिल्हा परिषदही आपल्या हातात आहे. त्यामुळे पराभवाच्या धक्‍क्‍यातून बाहेर या. निवडणूकीत आपण सक्षम यंत्रणा वापरली परंतु अपेक्षित यश मिळाले नाही. आता रडत घरी बसायचे नाही तर नव्या उमेदीने पुन्हा आता काम करायचे आहे. सक्षमपणे तालुक्‍याच्या विकासाला गती द्यायची आहे. सामाजिक न्याय असे वजनदार खाते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळाले आहे. पालकमंत्रिपदही आपल्यालाच मिळाले आहे. त्याचाही फायदा आपल्या सर्वांना होणार आहे असे सांगून ते म्हणाले की विधानसभेत कोणत्या गावाने किती मताधिक्‍य दिले,कोण मायनस राहिले याचा विचार करायचा नाही. आता निधी देताना दुजाभाव केला जाणार नाही. मात्र ज्यांनी भरीव दान दिले त्यांचा मात्र पहिल्या टप्प्यात विचार करायचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेवराई तालुक्‍याला भरपूर दिले आहे. तुम्ही आवाज द्या मी अडचणीच्या काळात तुमच्याकडे धावून येईल असा विश्वास व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com