ठाणे : ठाण्यातील विवियाना मॉल मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली होती. यानंतर त्यांना या प्रकरणी चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या निर्णयाला आव्हान देत त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. जामीन मिळल्यानंतर आव्हाड यांनी त्वरीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
ज्या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक पुरावा, दाखला उपलब्ध नाही, ते चित्रपटात दाखवले जात आहे. या गोष्टीला जर विरोध दर्शवला. आता यासाठी जर माझ्यावर जे काही कारवाई होणार असेल तर, मी फासावर पण जाईन. हर हर महादेव या चित्रपटात जाणीवपूर्वक कृष्ण भास्कर कुलकर्णी यांना दाखवलेच आले नाही.
हर हर महादेव या चित्रपटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज देण्यात आलेला आहे. राज ठाकरे हुशार नेते आहेत, मी त्यांच्या तुलनेत फार छोटा नेता आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी म्हणून, हे मी सांगणार नाही. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणं म्हणजेच अस्मितेची आणि मराठी माणसाची विकृती करणं आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी मला अटक करण्यात आली. माझ्या अटकेचा आणि पोलिसांचा संबंध नाही. मला अटक करताना पोलिसांच्या डोळ्यात हतबलता दिसून येत होती. पोलिसांवर दबाव आहे. मला चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं. मात्र त्यापूर्वीच म्हणजे दुपारी अडीच वाजता, मला ताब्यात घेण्यात आलं होतं, असं आव्हाड म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.