Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal VS BJP In Delhi : 26 वर्षाचा वनवास संपवण्यासाठी, भाजपला करावा लागणार केजरीवालांच्या 'या' पंचसूत्रीचा मुकाबला

Delhi Vidhan sabha Election AAP vs BJP : निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या घोषणांवर घोषणा चालू आहेत. त्यामुळे भाजप 'आप'च्या पंचसूत्रीचा मुकाबला कसा करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rashmi Mane

Arwind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. 2013 पासून दिल्लीत सत्तेत असलेल्या 'आप' आणि त्याआधी जवळ- जवळ 15 वर्ष सत्तेत असणारी काँग्रेस. त्यामुळे हा 26 वर्षांचा 'वनवास' संपवण्यासाठी भाजपने आता दिल्ली विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

मात्र, 2025 ची निवडणूक सर्वच पक्षासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. आता सत्तेच्या हॅटट्रिकच्या तयारीत असणारे अरविंद केजरीवाल विविध योजनांचा भडिमार दिल्लीच्या जनतेवर करत आहेत. त्यामुळेच त्यांनी गेल्या काही दिवसांत 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत.

मात्र, अजून भाजपकडून कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाहीये. निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या घोषणांवर घोषणा चालू आहेत. त्यामुळे भाजप 'आप'च्या पंचसूत्रीचा मुकाबला कसा करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या पाच मोठ्या घोषणा?

  1. महिलांसाठी दरमहा 2100 रुपये,

  2. संजीवनी योजनेंतर्गत 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी मोफत उपचार,

  3. वृद्धांसाठी पेन्शन योजना,

  4. दिल्लीकरांसाठी 24 तास शुद्ध पाणी

  5. मंदिरांचे पुजारी आणि गुरुद्वारांच्या पुजाऱ्यांना मानधन देण्याची घोषणा केली आहे.

दिल्लीची लढाई केजरीवाल आणि ‘आप’ दोघांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची आहे. केजरीवाल यांच्यासह पक्षाचे अनेक नेते 'आप'च्या या आश्वासनांना मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत. पण 'आप'ने जाहीर केलेल्या घोषणांवरून भाजप हल्लाबोल करत आहे. भाजप या आश्वासनांवर बोलताना, केजरीवाल (Arvind Kejriwal) जनतेला फक्त खोटी आश्वासने देत आहेत, त्यांनी नेहमीच जनतेची फसवणूक केली आहे, असे आरोप करत आहेत.

'आप'ने आतापर्यंत महिला सन्मान आणि संजीवनी योजना जाहीर केल्यावर भाजपने ही मोठी फसवणूक असल्याचे म्हटले आणि 'आप' गेली 10 वर्षे सत्तेत आहे, पण त्यांनी एकाही महिलेला 10 रुपयांची मदत दिली नाही. त्यांनी ही योजना यापूर्वीच राबवायला हवी होती. पण आता निवडणुकीपूर्वी ते वृद्ध आणि महिलांना खोटी आश्वासने देत आहेत.

भाजप 'आप'च्या आश्वासनांचा मुकाबला कसा करणार?

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) अद्याप कोणताही जाहीरनामा जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच कोणतेही मोठे आश्वासन दिलेले नाही. मात्र भाजप महिला, वृद्ध आणि तरुणांसाठी काही मोठ्या घोषणाही करू शकते, असे मानले जात आहे. नुकतेच भाजपचे खासदार मनोज तिवारी म्हणाले होते की, ते दिल्लीतील जनतेला 'आप'च्या आश्वासनापेक्षा 5 पट अधिक देण्यास तयार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT