Bhaiyyu Maharaj
Bhaiyyu Maharaj Sarkarnama
देश

भय्यू महाराजांच्या शिष्येसह सेवादार तीनच वर्षांत तुरुंगातून सुटणार कारण...

सरकारनामा ब्युरो

इंदोर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती. भय्यू महाराजांचे संबंध अनेक बड्या राजकारण्यांपासून अनेक सेलिब्रेटीपर्यंत होते. अखेर न्यायालयाने त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या तिघांना प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यात महाराजांच्या शिष्येसह सेवेदारांचा समावेश आहे. त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली असली तरी तीन वर्षांतच त्यांची कारागृहातून सुटका होणार आहे.

भय्यू महाराजांनी १२ जून २०१८ रोजी आत्महत्या केल्यानंतर साडेतीन वर्षांनंतर या प्रकरणी निकाल लागला आहे. इंदोर सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी तिन्ही आरोपींनी सहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. परंतु, त्यांना आता सुमारे तीनच वर्षे कारागृहात काढावी लागणार आहेत. यात मुख्य सेवादार विनायक दुधाळे (Vinayak Dudhale), चालक शरद देशमुख (Sharad Deshmukh) आणि शिष्या पलक पुराणिक (Palak Puranik) यांचा समावेश आहे. कारण घटना घडल्यानंतर सहाच महिन्यांत आरोपींनी अटक झाली होती. तेव्हापासून ते कारागृहात आहेत. त्यामुळे त्यांनी तीन वर्षे कारागृहात काढली आहेत. आता हा कालावधी त्यांच्या शिक्षेत मोडला जाणार आहे. यामुळे दोषींना जास्तीत जास्त तीनच वर्षे कारावासात काढावी लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Bhaiyyu Maharaj News)

भय्यू महाराज यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत 12 जून 2018 रोजी आत्महत्या केली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर सहाच महिन्यांत पलकसह तिघांना अटक करण्यात आली होती. तिघांना जानेवारी 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. भय्यू महाराजांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका पलकसह तिघांवर ठेवण्यात आला होता. आरोपींकडून त्यांना पैशांसाठी धमकावले जात होते, असेही न्यायालयात सिध्द झाले. त्यामुळे आयपीसी कलम 306 नुसार तिघांना दोषी धरत प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. (Bhaiyyu Maharaj Suicide Case Updates)

या प्रकरणात न्यायालयात 32 साक्षीदार सादर करण्यात आले. इंदोर येथील सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. विनायक दुधाळेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी भय्यूजींनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ट्रस्टची जबाबदारी विनायकवर सोपवली होती. संपत्ती नावावर केली नव्हती. त्यामुळे विनायकला फसवण्यात आले, असा दावा वकिलांनी केला. घटनेच्या काही दिवस आधी पुण्याला जात असताना भय्यूजींना सतत कुणाचे तरी फोन येत होते. पण त्याची चौकशी करण्यात आली नाही, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केली.

तिघांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. तिघे मिळून भय्यू महाराजांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत होते. त्यांनी सुसाईड नोटमध्ये विनायकचा उल्लेख केला होता. कारण विनायक हा त्यांचा 16 वर्षांपासूनचा सेवक होता. आत्महत्येनंतर त्यांचे मुलगी कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांच्यातील वादही समोर आला होता. पण त्यानंतर झालेल्या तपासात या तिघांची नावे समोर आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT