New Delhi News : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर प्रचंड तणाव वाढला आहे. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून जम्मू विमानतळ टार्गेट करत ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे. भारतानं पाकिस्तानच्या (India Vs Pakistan) ड्रोन हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर करत 8 ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पाकिस्तानचा प्रचंड भरवसा असलेलं एफ 16 मिसाईलही पाडलं आहे.
भारताच्या हद्दीतील गुरुवारी (ता.8) रात्रीच्या वेळी पाकिस्ताननं जम्मू शहरात ड्रोनचा हल्ला सुरू केला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आणि सायरन वाजवून लोकांना सावध करण्यात आलं आहे. देशातील आता राजस्थान,जम्मू-काश्मीर,पंजाबमध्ये पूर्णपणे 'ब्लॅकआउट'करण्यात आलं आहे. त्यानंतर या प्रदेशाचा ताबा लष्करानं (Indian Army) घेतला. दरम्यान,भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानने गुरुवारी सकाळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन सीमाभागात गोळीबार केला.तसेच भारताच्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने लाहोरमध्ये ड्रोन घुसवून त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम निकामी केली. त्यामुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. तरीही पाकिस्तानने पुन्हा जम्मूवर ड्रोन हल्ला करत भारताला ललकारलं आहे.
जम्मूनंतर राजस्थानच्या सीमावर्ती भागातही ब्कॅकआऊट करण्यात आले असून सीमावर्ती भागात भारतीय सैन्यदल सक्रिय झालं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला होता. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता हा तणाव टोकाला पोहचला असून दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहेत.
पाकने भारतातील उत्तर आणि पश्चिम भारतातील 15 लष्करी तळांवर ड्रोन आणि मिसाईलचा वापर करून हल्ले करण्याचा प्रय़त्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराकडूनच याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
त्यानुसार 7-8 मेच्या रात्री पाकिस्तानकडून भारतातील लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामध्ये अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसहर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज या लष्करी तळांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.