Basaveraj bomai
Basaveraj bomai Sarkarnama
देश

Karnataka Border Dispute : कर्नाटकची नवी खुरापत : थेट सांगलीच्या जत तालुक्यावरच केला दावा!

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Border Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेलं नसताना आता कर्नाटक सरकारने राज्याकडून नवी खुरापत सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगणार असल्याच्या विचाराबाबत कर्नाटक गांभीर्य़ाने विचार करतंय, असं वादग्रस्त विधान भाजपशासित कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. यामुळे राजकीय वातावरण पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

सांगली जिल्ह्यातला जत तालुका हा दुष्काळी भाग आहे. या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई असते. यामुळे इथल्या चाळीस पंचायतींनी कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव केलाय. याच ठरावावरती आता कर्नाटक सरकार गांभीर्य़ानं विचार करीत असल्याचं विधान बसवराज बोम्मई यांनी केले आहे. त्यामुळे जत तालुक्यावर आता कर्नाटक दावा सांगण्याच्या तयारीत आहे.

बोमई म्हणाले की, जत तालुका दुष्काळी असून, तिथे पाणी टंचाई असते. अशा दुष्काळी भागात पाणी देऊन मदत आमच्या सरकारने मदत केली. जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला. या ठरावावर आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. सीमा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील कन्नड शाळांना अनुदान देत आहोत. महाऱाष्ट्राकडून सौहार्द बिघडवण्याचा काम होत आहे.

या वक्तव्यावरून आता सीमावाद हा विषय अधिक पेट घेण्याची शक्यता आहे. यावर आता महाराष्ट्रातलं नेतेमंडळी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT