Kiran Kumar Reddy
Kiran Kumar Reddy  Sarkarnama
देश

Kiran Kumar Reddy News: भाजपमध्ये प्रवेश करताच माजी मुख्यमंत्र्यांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली..; म्हणाले, '"माझा राजा बुद्धीमान..

सरकारनामा ब्यूरो

kiran kumar reddy joins bjp : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किरण कुमार रेड्डी यांनी आज (शुक्रवारी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयात किरण प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. "आंध्रप्रदेशाच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये सामील झालो आहे," असे त्यांनी सांगितले.

भाजपमध्ये प्रवेश करताच किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रेड्डी यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले की काँग्रेसमधील अनेक मोठे नेते त्यांची दखल घेत नव्हते, मला काँग्रेस सोडावी लागेल, असा विचार मी कधीही केला नव्हता,"

राहुल गांधी यांच्या नावाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करुन ते म्हणाले, "माझा राजा बुद्धीमान आहे. ते स्वतःविषयी विचार करीत नाहीत. कुणाचाही सल्ला ते मानत नाही,"

"किरण कुमार रेड्डी यांच्या परिवारातील अनेक जण भाजपमध्ये आहेत. काही दिवसापूर्वी आमची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी ते मोदींच्या विचाराने खूप प्रभावित असल्याचे सांगितले होते.ते आज भाजपमध्ये सामील झाले आहेत.भष्ट्राचाराच्या विरोधातील भाजपच्या लढाईला ते अधिक मजबूत करतील, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे,"असे किरण प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

किरण कुमार रेड्डी यांनी ११ मार्च रोजी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने आंध्रप्रदेशचे विभाजन करुन तेलगंणा राज्याची निर्मिती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला रेड्डी यांनी विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत 'जय समैक्य आंध्र पार्टी' ची स्थापना केली होती. पण २०१८ मध्ये पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

रेड्डी यांनी १९८९ मध्ये आपल्या राजकीय जीवनाची सुरवात केली होती. ते वायलपाडू येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडूण आले होते. रेड्डी हे १९९९ आणि २००४ मध्ये एकाच मतदारसंघातून तर २००९ मध्ये पिलेरु विधानसभा मतदार संघातून आमदार झाले होते. २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आयएस राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांनी २०१०मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशचे नेतृत्व केले होते.

'काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक राज्य काँग्रेसपासून दूर जात आहेत,' असे रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला तेव्हा म्हटलं होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसचे लोकसभा खासदार मणिकम टागोर म्हणाले होते की, ज्या व्यक्तींना पक्षाकडून खूप काही लाभ मिळाला, ते आता भाजपमध्ये जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT