Lal Krishna Advani Sarkarnama
देश

Lal Krishna Advani : राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी भावूक; म्हणाले, 'हे नियतीने आधीच...'

Sunil Balasaheb Dhumal

Ayodhya Ram Temple : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीची 22 जानेवारी रोजी प्रदीर्घ प्रतीक्षा संपणार आहे. सध्या या भव्य मंदिराचा एक भाग तयार आहे. या मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दरम्यान, राम मंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले भाजप नेते लालकृष्ण अडवाणींनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. अयोध्येत राम मंदिर बांधणार हे नियतीने आधीच ठरवले होते. सध्या फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कमी जाणवत असल्याचे अडवाणी म्हणाले.

अडवाणींचा 'राष्ट्रधर्म' या मासिकात १५ जानेवारीला लेख प्रसिद्ध होणार आहे. त्यात त्यांनी आपल्या राम मंदिराबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. अडवाणींनी राम मंदिर आंदोलनासाठी रथयात्रा काढली होती. याची आठवण करून देताना ते म्हणाले, 'रथयात्रेला जवळपास 33 वर्षे उलटून गेली आहेत. 25 सप्टेंबर 1990 रोजी सकाळी रथयात्रा सुरू केली होती. त्यावेळी आम्हाला माहित नव्हते की ही यात्रा परमेश्वराच्या श्रद्धेने सुरू होईल. राम हे देशात एका चळवळीचे रूप घेईल.'

राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनाने संपूर्ण जिवन बदलल्याची कबुलीही अडवाणींनी (Lal Krishna Advani) दिली आहे. ते म्हणाले, 'रथयात्रेदरम्यान असे अनेक अनुभव आले, ज्यांचा माझ्या जीवनावर प्रभाव पडला. दुर्गम गावातील लोक रथ पाहून भावनेने भारावून माझ्याकडे यायचे. ते नमस्कार करून रामाचा जयघोष करत. देशभरात राममंदिराचे स्वप्न पाहणारे अनेक लोक आपली श्रद्धा लपवून जगत होते. आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.'

या लेखात अडवाणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुकही केले आहे. 'नियतीने ठरवले होते की अयोध्येत श्री रामाचे मंदिर निश्चितच बांधले जाईल. आता या मंदिराचे लोकार्पण होत असताना अटल बिहारी वाजपेयींनी मिस करत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात जेव्हा रामलल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा करतील, तेव्हा ते प्रत्येक भारतीयाचे प्रतिनिधीत्व करतील. मला आशा आहे की हे मंदिर सर्व भारतीयांना श्री रामाचे गुण अंगीकारण्याची प्रेरणा देईल.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि भाजप यांनी अयोध्येत श्री रामलल्ला मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यांनी 30 ऑक्टोबर १९९० ही देय तारीखही घोषित केली होती. याच संकल्पाने अडवाणींनी 25 सप्टेंबर 1990 ते 30 ऑक्टोबर दरम्यान सोमनाथ ते अयोध्या अशी 10 हजार किलोमीटरची रथयात्रा 10 राज्यांतून केली. या रथयात्रेने देशातील हिंदुत्वाची दडपलेली श्रद्धा जागृत केली होती. आता याला 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकाने पूर्ण होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT