Election Commission, BJP, Congress Sarkarnama
देश

Election Commission News : अग्निवीर, संविधान, धार्मिक मुद्यांवर बोलू नका! निवडणूक आयोगाने भाजपसह काँग्रेसला फटकारले

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Update) दोन अंतिम टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. भाजप, काँग्रेससह सर्व पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. मात्र, त्यातील काही मुद्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission News) आक्षेप घेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना निर्देश दिले आहेत. पक्षाच्या स्टार प्रचारकांनी धार्मिक, जातीय किंवा समाजात तेढ निर्माण होईल, अशा मुद्दांवर बोलू नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले असून आता उरलेल्या दोन टप्प्यांतील मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र, मागील पाच टप्प्यांमध्ये सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून धार्मिक, जातीय, अग्निवीर योजनेसह इतर मुद्यांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका-टिप्पणी करण्यात आली. आयोगाने काही नेत्यांवर सक्त ताकीद किंवा प्रचारबंदीची कारवाईही केली. (Latest Political News)

आता सहाव्या टप्प्याचे मतदान तीन दिवसांवर आलेले असताना आयोगाने पुन्हा भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या प्रमुख राष्ट्रीय पक्षांना नोटीस बजावली आहे. भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण निवडणुकीमुळे प्रभावित केले जाऊ शकत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. (Election Commission Latest Update)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयोगाने म्हटले आहे की, ‘भारतीय मतदारांच्या गुणवत्तापूर्ण निवडणूक अनुभवाचा वारसा कमजोर करण्याची परवानगी दोन्ही मोठ्या पक्षांना नाही.’ प्रचारात धार्मिक आणि सांप्रदायिक मुद्यांवर तीव्र भाष्य करणे भाजप आणि प्रचाराकांनी टाळावे, असे निर्देश आयोगाने दिले आहे. काँग्रेसकडून याबाबत तक्रार करण्यात आली होती. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याची टीका पंतप्रधान मोदींकडून केली जाते.

आयोगाने काँग्रेसलाही खडसावले आहे. सत्तेत आल्यानंतर भाजप संविधान बदलेल, अशाप्रकारचे दावे पक्षातील नेत्यांनी करू नये, असे आयोगाने म्हटले आहे. अग्निवीर योजनेवरून राजकारण केले जात असल्याच्या मुद्यावरही आयोगाने काँग्रेसला निर्देश दिले आहेत. सत्तेत आल्यानंतर अग्निवीर योजना रद्द केली जाईल, अशी घोषणा राहुल गांधींनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT