NIRMALA SITARAMAN
NIRMALA SITARAMAN  Sarkarnama
देश

Union Budget 2023 : अर्थसंकल्पात दहा मोठ्या घोषणा; सर्व सामान्यांना होणार 'हा' फायदा

सरकारनामा ब्यूरो

Union Budget 2023 : आज (दि.१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत. मंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे थेट सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे.

यामध्ये महिलांसाठी एका योजनेची घोषणा करण्यात आली आहे. तसेच कृषी क्षेत्राशी निगडीत स्टार्टअप्सला सरकार मोठी ताकद देणार आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तब्बल २ लाख ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या अर्थसंकल्पात दहा कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या? ते थोडक्यात जाणून घेऊयात...

अर्थसंकल्पातील दहा मोठ्या घोषणा कोणत्या?

- भारतीय रेल्वेला २.४ लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वे आता सुपरफास्ट होणार असून भारतीय रेल्वेत ७५००० नवी नोकर भरती करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

- परदेशात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३० कौशल्य भारत केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. तसेच नॅशनल अॅप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम तयार करून विद्यार्थ्यांना थेट मदत देण्यात येणार आहेत.

- शहरी भागातील लोकांना संधी मिळावी, सुविधा मिळावी याकरता शहरांना आणि राज्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहेत. यासाठी शहरी पायाभूत सुविधा निधी तयार केला जाणार आहे.

- देशात मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मोबाईल फोनच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बॅटरीजवरील कस्टम ड्युटी २.५ टक्क्यांनी कमी होणार आहे.

- कोणताही पीक घेण्याकरता शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे. कृषीपुरक स्टार्टअपसाठी मदत करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच पीएम मत्स्य संपदा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ६ हजार कोटी निधीची तरदूत करण्यात आली आहे.

- युवकांना प्रशिक्षणासाठी ३३ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० पुढच्या तीन वर्षांत लाँच केली जाणार आहे. तसेच नोकरीवरच प्रशिक्षण व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

- मशीनद्वारे मैला उचलण्याची नवी योजना आणली जाणार आहे. या योजनेचा देशातील शहारांना मोठा फायदा होईल. तसेच युद्धपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा आज या बजेट दरम्यान करण्यात आली.

- कोरोनाच्या काळात ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. या योजनेला दोन लाख कोटींचा खर्च करण्यात आला. पुढील वर्षभर ही योजना सुरू राहणार आहे.

या गोष्टी महागणार

सोनं, चांदीचे दागिने, सिगारेट महागणार यासह अजून काही गोष्टीचे दर महागणार आहेत.

या गोष्टी होणार स्वस्त

मोबाईल, इलेक्ट्रीक कार, कॅमेरा, लेन्स, खेळणी स्वस्त होणार असल्याचे सीतारमण यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT