Maharashtra Politics  Sarkarnama
देश

Maharashtra Politics : सकाळच्या शपथविधीनंतर शिवसेना आमदार ठाकरेंना म्हणाले, " काहीही करा पण .." ; देशमुखांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्यातील सत्तासंघर्षांतील घडामोडीसोबत सकाळच्या शपथविधीची नेहमीच चर्चा होत असते. या शपथविधीमुळे महाराष्ट्राचं राजकारण काही काळ ढवळून निघाल होतं. ज्यावेळी सकाळचा हा शपथविधी झाला तेव्हा शिवसेना व दोन्ही काँग्रेस यांच्यात आघाडी करण्याच्या हालचाली सुरु होत्या.

सकाळचा शपथविधी पाहिल्यानंतर तेव्हा शिवसेनेत नेमकं काय घडलं याबाबत ठाकरे गटाच्या दोन आमदारांनी सविस्तर सांगितले. 'आवाज कुणाचा' या ठाकरे गटाच्या कार्यक्रमात आमदार नितीन देशमुख आणि आमदार कैलास पाटील यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. (Latest Marathi News)

आमदार नितीन देशमुख म्हणाले, "अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळी शपथविधी झाला आणि सर्व चित्रच बदलले. तो शपथविधी बघितल्यानंतर शिवसेनेचे आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. आमदारांनी उद्धव ठाकरे यांना आग्रह केला की, काहीही करा पण महाविकास आघाडीसोबत आपली सत्ता आणा. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तेचा निर्णय झाला,"

"महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय ५६ आमदारांचा होता. सकाळचा शपथविधी झाल्यानंतर आमचे आमदार उद्धव ठाकरेंना म्हणाले, काही करा पण महाविकास आघाडीसोबत आपली सत्ता आणा. मग त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आली," असे देशमुख म्हणाले.

ते आमच्यासोबत काय प्रामाणिक राहणार

शिवसेनेतील बंडखोरीबाबत आमदार कैलास पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. "काही आमदारांची आधीपासूनच जुळवाजुळव सुरु होती. आपण उद्धव ठाकरेंना तयार करु. आपण भाजपसोबत जाऊ, अशी काही आमदारांची चर्चा सुरु होती. पण मी आणि नितीन देशमुख यांनी ठरवलं होतं की, काहीही झालं तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नाही. जे शिंदे मातोश्री सोबत प्रामाणिक राहिले नाहीत. ते आमच्यासोबत काय प्रामाणिक राहणार, असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला.

आम्हाला कुणकुण लागली होती...

"उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा सात महिन्यांतच सत्तांतराच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्याची कुण कुण लागली होती. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटतील याचा अंदाज आला नाही. २० ते २२ आमदार जातील आणि त्याचा सरकारवर काही परिणाम होणार नाही, असं आम्हाला वाटतं होतं, असे देशमुख म्हणाले.

अमित शाह यांना माहिती होतं..

"एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे बंडाच्या एक महिना आधीच ठरलं होतं. ठाकरे सरकार पाडायचे आहे याची माहिती फक्त देवेंद्र फडणवीस यांना होती. पण शिंदेच मुख्यमंत्री होणार हे केंद्रीय अमित शाह यांना माहिती होतं, असा गौप्यस्फोट नितीन देशमुख यांनी केला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT