New Delhi News : प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये देश-विदेशातून आलेल्या कोट्यवधी भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले. ऐतिहासिक महाकुंभ मेळा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचे सहभागाबद्दल आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी भाविकांची माफीही मागितली आहे.
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना उद्देशून Narendramodi.in यावर देशवासियांना उद्देशून आपले विचार मांडले आहेत. एकतेचा महायज्ञ संपन्न झाला. मागील 45 दिवस मी पाहिले की, देशातील कानाकोपऱ्यातून लाखो लोक संगमावर येत होते. स्नानासाठीचा स्वर सतत वाढत होता. प्रयागराजमधील महाकुंभचे आयोजन अभ्यासाचा विषय बनला आहे. संपूर्ण जगात एवढ्या मोठ्या प्रमाणातील आयोजनाचे दुसरे कुठलेही उदाहरण नाही, असे मोदींनी म्हटले आहे.
प्रयागराजमधील संख्येने निश्चितच एक विक्रम केला आहे. मागील काही दशंकात असे कधीच झाले नाही. पुढील अनेक शतकांसाठी एक पाया रचला गेला आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट लोकांनी एकतेच्या महाकुंभमध्ये सहभाग घेतला. ही युग परिवर्तनाची चाहूल असून भारत नवे भविष्य लिहिण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
एवढे मोठे आयोजन सोपे नव्हते, हे मला माहित आहे. आमच्या प्रार्थनेत काही कमतरता राहिल्या असतील तर आम्हाला क्षमा करा, अशी प्रार्थना मी गंगा, यमुना आणि सरस्वती मातेला करतो. जनता जर्नादन ही माझ्यासाठी देवासमान आहे. भाविकांच्या सेवेतही काही कमतरता राहिली असेल तर मी जनतेची क्षमा मागतो, असे मोदींनी म्हटले आहे.
देशातील 140 कोटी लोकांनी ज्याप्रकारे प्रयागराजमध्ये एकतेच्या महाकुंभला आज जगातील एक महान ओळख बनवली, ती अद्भूत आहे. हे आयोजन केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर आपली सांस्कृतिक एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.