Delhi Assembly : दिल्लीत राडा, विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 21 आमदारांना ‘नो एन्ट्री’

AAP Politics BJP Government Assembly Session News : दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सुरू असून आपच्या 21 आमदारांना तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
Delhi Assembly
Delhi AssemblySarkarnama
Published on
Updated on

New Delhi Political News : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजपची सत्ता आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. निवडणुकीपासूनच भाजप विरुध् आप असा पेटलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आपने आक्रमक पवित्रा घेत भाजपला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी विधानसभेबाहेर जोरदार राडा झाला.

विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 21 आमदारांना आवारातही एन्ट्री देण्यात आली नाही. विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आपच्या इतर 20 आमदारांना विधानसभेत प्रवेश करण्यापासून दिल्ली पोलिसांनी रोखले. विधानसभेचे अध्यक्ष वीजेंद्र गुप्ता यांच्या आदेशानुसार प्रवेश नाकारला जात असल्याचे पोलिसांकडून आतिशी यांना सांगण्यात आले. त्यामुळे सर्व आमदार आक्रमक झाले.

Delhi Assembly
Ramdas Athawale allegation : ''राहुल गांधी अन् उद्धव ठाकरेंनी केला हिंदूंचा अपमान'' ; रामदास आठवलेंचा आरोप!

गुप्ता यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपच्या 21 आमदारांना तीन दिवसांसाठी निलंबित केले आहे. एक आमदार सभागृहात उपस्थित नसल्याने कारवाईपासून बचावले. जय भीमचे नारे लगावल्याने आम्हाला निलंबित करण्यात आल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप.

आतिशी यांनी म्हटले आहे की, भाजपने सत्तेत येताच हुकुमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जय भीमच्या घोषणा दिल्याने आपच्या आमदारांना तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आज निवडून आलेल्या आमदारांना विधानसभेच्या आवारातही घुसू दिले जात नाही. दिल्ली विधानसभेच्या इतिहासात असे कधीच झाले नाही, अशी टीका आतिशी यांनी केली आहे.

Delhi Assembly
Modi Government : शिक्षा झालेल्या नेत्यांना कायमची निवडणूक बंदी? मोदी सरकारची भूमिका ठरली!

आपच्या आमदारांकडून वीजेंद्र गुप्ता यांची भेट घेतली जाऊ शकते. पण त्यांच्याकडून त्यांना किती प्रतिसाद मिळणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नायब राज्यपालांचे भाषण सुरू असताना गुप्ता यांनी सभागृहात मार्शल बोलवून आपच्या गोंधळी आमदारांना बाहेर घेऊन जाण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आप आणि भाजपमधील संघर्ष अधिकच पेटण्याची शक्यता आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com