Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Press Conference : राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत आकडेवारीच दिली; भाजपच्या स्ट्राईक रेटवरही सवाल...

Supriya Sule News Sanjay Raut Latest News Maharashtra Election : राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी शुक्रवारी दिल्लीत एकत्रित पत्रकार परिषद घेतली.

Rajanand More

Assembly Election Result News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान अचानक वाढलेल्या मतदारांबाबत काँग्रेसचे नेते राहुल यांनी पुन्हा आक्षेप घेतला. मतदार यादी आणि मतदानाचा पॅटर्न आम्ही अभ्यासला. त्यामध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा राहुल यांनी केला. यावेळी त्यांनी आकडेवारी मांडत केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल केले.

दिल्लीत राहुल गांधी, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. राहुल म्हणाले, पाच वर्षांत विधानसभा 2019 आणि लोकसभा 2024 निवडणुकीदरम्यान 32 लाख नवीन मतदार आले. पण पाच महिन्यांत 39 लाख नवे मतदार आले. हे नवे मतदार कोण आहेत, ते अचानक कसे वाढले, हा निवडणूक आयोगाला आमचा प्रश्न असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

सरकारच्या माहितीनुसार, महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे. पण निवडणूक आयोगानुसार मतदार 9.7 कोटी मतदार आहेत. प्रौढ मतदारांपेक्षा मतदार अधिक कसे, असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला. कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला 1.36 लाख मतदान मिळाले. विधानसभेतही तेवढीच मते मिळाली. विधानसभेआधी नवीन 35 हजार मते जोडली जातात. तेवढ्या मतांनी भाजपचा विजय होतो. अनेक मतदारसंघात जिथे मते वाढली, ती मते भाजपला मिळाली आहेत. अशी अनेक उदाहरणे असल्याचे राहुल यांनी सांगितले.

काही मतदार अचानक वाढले. आमच्या तीन पक्षांना मिळालेली मते कमी झालेली नाहीत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदान जवळपास सारखेच होते. भाजपच्या मतांमध्ये 35 लाख मतांची वाढ झाली. हाच मुलभूत प्रश्न आहे, असे राहुल म्हणाले. भाजपचा स्ट्राईक रेट 90 टक्के राहिला आहे. इतिहासात एवढा स्ट्राईट रेट कधीच नव्हता, असेही राहुल म्हणाले.

मतदारांची नावे, पत्ते, फोटोसह आम्हाला हवी आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी आम्हाला हवी आहे. नवीन मतदार कोण, हे जाणून घ्यायचे आहे. अनेक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अनेक मतदारांची नावे इतर मतदारसंघात टाकण्यात आली. आम्ही सातत्याने निवडणूक आयोगाकडे याबाबत विनंती करत आहोत. पण उत्तर मिळत नाही, अशी नाराजी राहुल यांनी व्यक्त केली.

यामागे एकमेव कारण आहे, काहीतरी चुकीचे घडले आहे. महाराष्ट्रातील तीन महत्वाचे पक्ष निवडणूक आयोगाकडे मागणी करत आहे. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की, निवडणुकीबाबत पारदर्शकता हवी. ही त्यांची जबाबदारी आहे, असे राहुल यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT