Lok Sabha, Assembly Election Sarkarnama
देश

Rajya Sabha Session : खासदार, आमदारकीची निवडणूक लढण्याचे वय कमी होणार? संसदेत आला विषय...

Rajanand More

New Delhi : लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी सध्या वयाची 25 वर्षे पूर्ण असायला हवीत, अशी अट आहे. ही अट कमी करण्याची मागण राज्यसभेत करण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार यावर विचार करणार का, याकडे युवकांचे लक्ष लागले आहे.

देशात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वाधिक तरूण देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. पण विधानसभा आणि लोकसभेत या युवकांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यामुळे युवकांचा देश असला तरी लोकसभेत ज्येष्ठ खासदारांची संख्या अधिक असल्याचा मुद्दा आपचे खासदार राघव चड्ढा यांनी गुरूवारी मांडला.

विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठीचे वय 25 वरून 21 वर्षे करण्याची मागणी चड्ढा यांनी केली आहे. ते म्हणाले, भारत हा जगातील सर्वात तरूण देश आहे. देशातील 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांहून कमी वर्याची आहे. तर आपली 50 टक्के लोकसंख्या 25 वर्षेहून कमी वयाची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 26 टक्के खासदार 40 वर्षांहून कमी वयाचे होते.

दोन महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या 17 व्या लोकसभेतील खासदारांमध्ये 40 टक्क्यांपेकी कमी वय असलेले केवळ 12 टक्के खासदार आहेत. युवा देश आणि ज्येष्ठ राजकारणी, अशी आपली स्थिती आहे. आपल्याला युवा देश आणि युवा राजकारणी असा प्रवास करावा लागेल, असे चड्ढा म्हणाले.

युवकांनी राजकारणात येण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यायला हवी. अधिकाधिक युवकांनी निवडणूक लढवावी, यासाठी निवडणूक लढण्याचे वय 25 वरून 21 वर्षे करावे, असे चड्ढा म्हणाले. त्यामुळे आता त्यांच्या या मागणीवर सरकार विचार करणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. असे झाल्यास अनेत युवा राजकारणी विधानसभा आणि लोकसभेत पोहचतील.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT