PM Modi Bankimda remark : ‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चेची सुरूवात करताना वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्यलढ्याचे मंत्र बनल्याचे सांगितले. तसेच त्यांनी काँग्रेसने या भावगीताचे तुकडे-तुकडे केल्याची टीकाही त्यांनी केली. मात्र, त्यांच्या भाषणादरम्यान ‘दा’ की ‘बाबू’ असा संभ्रमही पाहायला मिळाला.
पंतप्रधान मोदींकडून वंदे मातरम् हे गीत लिहिणारे बंगाली कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा उल्लेख ‘बंकिम दा’ असा करण्यात आला. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यांनी बंकिमंचंद्र चॅटर्जी यांच्या नावासमोर ‘दा’ उल्लेख करू नये असे सांगितले. ‘दा’ हे ‘दादा’चे म्हणजेच ‘भाऊ’ या शब्दाचे लघुरूप आहे. भाऊ, मित्र किंवा समवयस्कांशी संवाद साधताना प्रामुख्याने बंगाली लोक नावापुढे ‘दा’चा उल्लेख करतात.
सौगत रॉय यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान त्यांना थांबवत तुम्ही ‘बंकिम दा’ असे म्हणत आहात. त्याऐवजी तुम्ही ‘बंकिम बाबू’ म्हणायला हवे, असे सांगितले. रॉय यांनी लक्षात आणून दिलेली चूक पंतप्रधानांनीही तातडीने मान्य करत चारवेळा Thank You म्हणत त्यांचे आभार मानले.
‘मी बंकिम बाबू म्हणेन, धन्यवाद. मी तुमच्या भावनांचा आदर करतो’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मी तुम्हाला दादा म्हणू शकतो ना? की त्यालाही तुमची हरकत आहे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी भाषणादरम्यान सांगितले की, महात्मा गांधी यांना १९०५ मध्ये वंदे मातरम् राष्ट्रगीत वाटत होते. त्यांनी याबाबत लिहिले होते. वंदे मातरम एवढे महान होते, त्याची भावना एवढी महान होती, मग त्यावर एवढा अन्याय का झाला? विश्वासघात का झाला? ती कोणता ताकद होती, ज्यांची इच्छा महात्मा गांधींच्या भावनांवरही भारी पडली. ज्या ताकदीने वंदे मातरमसारख्या पवित्र भावनेलाही वादात ओढले, असे मोदी यांनी नमूद केले.
वंदे मातरम् विरोधात मोहम्मद अली जीना यांनी १५ ऑक्टोबर १९३७ मध्ये नारा दिला. पंडित नेहरूंना आपले आसन डगमगताना दिसले. नेहरूंनी त्यांना करारा जवाब देण्याऐवजी वंदे मातरमची पडताळणी सुरू केली. जीनाच्या विरोधानंतरही २० ऑक्टोबरला नेहरूंना नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून जीनाच्या भावनेशी संमती दाखवत म्हटले वंदे मातरमची आनंदमठशी संबंधित पार्श्वभूमी मुस्लिमांना इरिटेट करेल, असे पत्रात लिहिल्याचे मोदींनी सांगितले.
मी वंदे मातरम गीताचे बॅकराऊंड वाचले आहे. मला वाटते यामुळे मुस्लिम भडकतील, असे नेहरूंनी पत्रात लिहिले होते. त्यावेळी काँग्रेसने म्हटले की, २६ ऑक्टोबरच्या बंगालमधील बैठकीत वंदे मातरमची समिक्षा केली जाईल. याने संपूर्ण देश हैराण झाला होता. संपूर्ण देशात देशभक्तांनी या प्रस्तावाविरोधात प्रभातफेऱ्या निघाल्या. पण देशाचे दुर्भाग्य म्हणजे काँग्रेसने २६ ऑक्टोबरला वंदे मातरम वर समोझाता केला. त्याचे तुकडे करण्यात आले. काँग्रेसने मुस्लिम लीगच्या पुढे गुडघे टेकले होते, अशी टीका मोदींनी केली. तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या दबावाखाली काँग्रेसने वंदे मातरम तोडण्यासाठी झुकले. त्यामुळे काँग्रेसला एक दिवस भारताच्या फाळणीसाठी झुकावे लागले. दुर्दैवाने काँग्रेसची धोरणे अजूनही तशीच आहेत, असेही मोदी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.