CM Pramod sawant  sarkarnama
देश

Goa Politics : '...तर गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावातले सरपंच असते', विरोधी पक्षनेत्याने सुनावले

सरकारनामा ब्युरो

Goa Political News : गोवा राज्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. गोवा महाराष्ट्रात विलिन व्हावा का? यासाठी मतदान झाले होते. गोवा स्वतंत्र राज्य असावे, यासाठी 54 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे हा दिवस 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा करण्याचे खासगी ठराव गोवा विधानसभेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मांडले.

'अस्मिताय दिस' साजरा करण्याच्या वरून 'गोवा महाराष्ट्रात विलिन झाला असताना तर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज एखाद्या गावचे सरपंच असते', असा खोचक टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सावंत यांना लगावला.

गोवा विधानसभेचे Assembly पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिशेनात युरी आलेमाव यांनी खासगी 'अस्मिताय दिस' साजरा करण्याचा ठराव मांडताना सर्वच पक्षाचे आमदार त्याला पाठींबा देतील, असे म्हणाले. 16 जानेवारी हा दिवस 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा करण्याची मागणी आलेमाव यांनी केली आहे.

16 जानेवारी 1967 हा दिवस गोव्याच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण याच दिवशी गोव्याचे महाराष्ट्रात Maharashtra विलीनीकरण व्हावे की गोवा केंद्रशासित प्रदेश व्हावा, यासाठी जनमताचे कौल घेतला गेला. 81 टक्के मतदान झाले.

त्यावेळी गोव्यातील एकूण 38 लाख 8 हजार 432 मतदारांपैकी 31 लाख 7 हजार 633 मतदारांनी मतदान केले. मतमोजणी तब्बल तीन दिवस चालली. विलीनीकरणाच्या विरोधात 17 लाख 21 हजार 91 मते तर बाजूने 13 लाख 81 हजार 70 मते पडली. 54 टक्के मते विलीनीकरणाच्या विरोधात पडल्यामुळे गोवा हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश राहील. गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा 1987 साली मिळाला.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT