Ajit Pawar, Gopichand Padalkar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar On Padalkar : जयंत पाटलांवरील टीकेमुळे अजितदादांचाही त्रागा : CM फडणवीसांच्या नागपूरमधून पडळकरांना सुनावलं

Maharashtra Political News: कुणीही कोणत्याही पक्षाचे असो, पण राजकारणात वावरताना सुसंकृतपणा दाखवायला हवा. प्रत्येकाने बोलत असताना कुणाला वेदना देणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता गोपीचंद पडळकरांना दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून टीका केली आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत पडळकरांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. टीका करताना पडळकरांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख केला. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. पडळकरांच्या या वक्तव्याचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. कुणीही कोणत्याही पक्षाचे असो, पण राजकारणात वावरताना सुसंकृतपणा दाखवायला हवा. प्रत्येकाने बोलत असताना कुणाला वेदना देणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता गोपीचंद पडळकरांना दिला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. विशेषतः, या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडळकर यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand padalkar) जयंत पाटलांवर टीका करता पातळी सोडल्याचं दिसून आले. त्यानंतर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. पण व्यक्त होताना समाजामध्ये सलोखा राहील, कुणाच्या भावना दुखावणार नाहीत यासाठी प्रयत्न केला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

पडळकर यांनी काय विधान केले याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण मी याच विचाराचा आहे कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असो तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करु नये, अशा प्रकारचे वक्तव्य हे वेदना देणारे असते, अशी टीका अजित पवार यांनी केली.

वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचे एकमेव धोरण आहे. महायुती तीनही पक्षातील ज्या लोकांनी ते विधान केले आहे त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या विधानसंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे आमचं धोरण आहे. शिवसेनेसंदर्भात जर काही वादग्रस्त विधान झाले तर एकनाथ शिंदे बोलतील, आमच्या पक्षाकडून जर काही विधान झालं त्याची जबाबदारी माझी आहे आणि भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची असल्याचे अजित पवार म्हणाले.

गोपीचंद पडळकरांची पातळी सोडून टीका

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली. या टीकेमुळे पडळकरांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस गोपीचंद पडळकरांना आवरणार तरी कसे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सुसंस्कृत भाजपला पडळकरांची ही भाषा मान्य आहे का ? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT