anil deshmukh sarkarnama
महाराष्ट्र

MLA Anil Deshmukh News : 'प्रत्येक शहरात मनुस्मृतीचं दहन करावं'; अनिल देशमुखांनी भाजपला दिलं आव्हान

Pradeep Pendhare

BR Ambedkar Photo : प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुषमा अंधारे आणि आमदार रोहित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मनुस्मृती दहनाबाबत भाजपला मोठं आव्हान दिलं आहे. 'भाजपने हिंमत करून प्रत्येक शहरात मनुस्मृती दहन आंदोलन करावं', असे अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट शेअर करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या चूक नकळत झाल्याचे सांगून भाजपच्या घाणेरड्या राजकारणावर बोट ठेवले. भाजपला जितेंद्र आव्हाडांचा खरंच निषेध करायचा असेल तर, त्यांनी प्रत्येक शहरात मनुस्मृती दहन आंदोलन करावं! जितेंद्र आव्हाड यांची वंदनीय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति असलेली निष्ठा आणि आदर गेली चार दशके महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नकळत अनवधानाने ती कृती झाली आहे. महामानवाचे पोस्टर चुकून फाटले गेले. त्याबद्दल त्यांनी माफी मागितल्याकडे देखील अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल मनुस्मृती (Manusmriti) दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनवधानाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाला. यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचा निषेध केला जात आहे. त्यांच्या पोस्टरला जोडे मारले जात आहे. टीका केली जात आहे. या कृतीवर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार आशिष शेलार यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका होत असताना, त्यांच्या समर्थनात महाविकास आघाडीतील नेते आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह समविचार नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ देखील जितेंद्र आव्हाड यांची बाजू लावून धरली आहे. आमदार रोहित पवार यांनी आंदोलन करणाऱ्या भाजपला अंगावर घेतले. यातच माजी मंत्री अनिल देशमुख यांनी देखील भाजपला आव्हान दिले. "जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे. अनवधानाने झालेली चूक आंबेडकरी जनतेला माहिती आहे. चूक नकळत झाली आहे. मतांसाठी भाजप करत असलेल्या घाणेरड्या राजकारणाला जनता कधीच भुलणार नाही", असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT