Bacchu Kadu News : विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. 'प्रहार' प्रमुख बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. शिंदेंना भेटण्यापूर्वीच माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मी शेतकरी,मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहे.
बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार विधान परिषदेच्या आमदारकीसोबत पुढील सहा महिन्यात त्यांना मंत्रिपद देखील देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, प्रहार संघटनेबाबत बच्चू कडूंनी मोठा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेकडून प्रहार राजकीय संघटना शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवण्यात आली होती. याबाबत बोलताना कडू म्हणाले की, प्रहार ही सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. ती कायम राहिली. आणि प्रहारमधील ज्या राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय काम करायचे आहे ते शिवसेनेत येतील.
मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, अजून कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे दुपारी 12 वाजता दोनही उमदेवारांची नावे जाहीर करतील. दरम्यान, बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांची नावे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.