Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 डिसेंबरला खातेवाटप केले. खातेवाटप केल्यानंतर आता प्रत्येक मंत्र्यांकडे खासगी सचिव, पीए आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि स्टाफच्या नेमणुकीची लगबग सुरू झाली आहे. या मंत्र्यांच्या स्टाफ नेमणुक करताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न आहे. (Mahayuti News)
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अशास्वरूपाचा फॉर्म्युला त्यांनी वापरत मंत्रालयात वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रोखल्या होत्या. आताही त्याच पद्धतीचा फॉर्म्युला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वापरणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीला ब्रेक लागणार आहे.
महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्ष असलेल्या भाजपसहित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनाही येत्या काळात जर नवीन स्टाफची नेमणूक करायची असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच मंत्र्यांना त्यांचे खासगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका करता येणार आहेत.
राज्यातील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर आता सोमवारपासून ते नव्या खात्याचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर नवीन मंत्र्यांना स्टाफची आवश्यकता भासणार आहे. तर जुने मंत्री त्यांच्याकडे असलेला स्टाफ कायम ठेवतील असे वाटते. जवळपास अर्धे मंत्री जुनेच आहेत तर अर्धे मंत्री नवीन असणार आहेत. नवीन मंत्र्यांना स्टाफची आवश्यकता भासणार आहे. पण या नेमणुका आता केवळ मंत्र्यांच्या मर्जीने होणार नाहीत. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयातून या नावांना संमती मिळाल्यानंतरच या नेमणुका करता येणार असल्याचे समजते.
2019 साली सुरुवातीचे अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. यावेळेस आघाडी सरकारमधील मंत्र्याकडे काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकींना यावेळी ब्रेक लावण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात जे अधिकारी मंत्र्यांच्या आस्थापनेवर काम करत होते. त्यांना महायुती सरकारच्या मंत्र्यांसोबत काम करता येणार नाही, अशी माहिती आहे. अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका होऊ नये यासाठीच मुख्यमंत्री कार्यालयाकडून चाप लावण्यात आला आहे. त्यामुळेच येत्या काळात 'सीएमओ'कडून नावांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतरच नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.