Mumbai News : साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकानेच मर्यादा ठेवल्या पाहिजेत. पक्षीय पातळीवरच्या टीका टाळल्या पाहिजेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे कान टोचले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
अखिल भारतीय साहित्य संमेलनामधून द्वेष दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा अशा पद्धतीने वापर केला जाणे कितपत योग्य वाटते? असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला होता.
त्यावर फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत. विशेषतः साहित्यिकांना वारंवार वाटते की राजकारण्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊ नयेत. मग त्यांनीही पक्षीय पातळीवरील कमेंट्स करणे योग्य नाही. त्यांनी देखील मर्यादा पाळायला हव्यात”, असा सल्लाही त्यांनी दिला.
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, “त्या पक्षात काय चालालयं यावर मी कमेंट करू शकत नाही.” असे म्हणत त्यांनी थेट बोलणे टाळले. पण सगळ्यांनाच बोलण्याच्या मर्यादा ठेवल्या पाहिजेत असे सांगत, फडणवीस यांनी नाव न घेता गोऱ्हे यांचे कानही टोचले.
साहित्य संमेलनात रविवारी (ता. २३ फेब्रुवारी) असे घडलो आम्ही या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पदं मिळायचं, नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो’, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांवर चहुबाजूंनी टीका झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.