Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet expansion : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांच्या वाट्याला भोपळाच; तर मुंबई,मराठवाड्यातून...

Political News : मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला असून महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी होत आहे. त्यामुळे सकाळपासून संभाव्य मंत्र्यांना मंत्रिपदासाठी फोनाफोनी होत आहे. त्यातच आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले 42 मंत्री 20 जिल्ह्यातील असून 16 जिल्ह्यांची पाटी कोरीच असल्याचे दिसत आहे.

Sachin Waghmare

Nagpur News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. महायुतीला बहुमत मिळाल्याने 5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. निकाल लागल्यानंतर गेल्या 22 दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. रविवारी मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला असून महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी होत आहे. त्यामुळे सकाळपासून संभाव्य मंत्र्यांना मंत्रिपदासाठी फोनाफोनी होत आहे. त्यातच आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले 42 मंत्री 20 जिल्ह्यातील असून 16 जिल्ह्यांची पाटी कोरीच असल्याचे दिसत आहे. (Maharashtra Cabinet expansion News )

राज्यातील सर्वच विभागातून महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे सर्वच भागातील लोकप्रतिनिधीना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे वाटत होते मात्र तसे झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळात 42 मंत्री आहेत त्यामध्ये 20 जिल्ह्यातील आमदारांना संधी मिळाली आहे तर दुसरीकडे 16 जिल्ह्यांची पाटी कोरीच असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपकडून (BJP) मंत्रीपदासाठी 19 जणांना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 10 जण तर शिवसेना शिंदे गटाकडून 11 जणांना मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचे प्राबल्य

या मंत्रीपदामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाने बाजी मारली असून पश्चिम महाराष्ट्रातील 10 मंत्री महायुती सरकारमध्ये असणार आहेत. विदर्भांमधील तबल नऊ मंत्री असणार आहेत. ठाणे, कोकण विभागामधून आठ मंत्री असतील, तर उत्तर महाराष्ट्रातून सात मंत्री असणार आहेत. त्यामुळे म्हणजे एक प्रकारे या मंत्रिमंडळावर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचे प्राबल्य असणार आहे.

विदर्भातील सात तर मराठवाड्यामधील चार जिल्हे वंचित

मराठवाड्यातून सहा आणि मुंबईतील फक्त दोन मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये तब्बल 16 जिल्ह्यातील पाटी कोरी आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांना मंत्रीपद मिळालेले नाही, तर मराठवाडामधील चार जिल्ह्यांना मंत्रीपदापासून मुकावे लागले आहे.

सातारा, पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चार-चार मंत्री

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण 42 मंत्री आहेत. यामधील सर्व मंत्री हे 16 जिल्ह्यांमधून येतात. त्यामध्ये सातारा आणि पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चार-चार मंत्री आहेत. कोकणमधील तिन्ही जिल्ह्यांना मंत्रीपद मिळाले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली जिल्ह्याना मंत्रिपद मिळाले नाहीत.

या जिल्ह्यांची असणार पाटी कोरी

मराठवाड्यामधील धाराशिव, नांदेड, जालना, हिंगोली या जिल्ह्यांची पाठी मात्र कोरी राहिली आहे. विदर्भातून नऊ मंत्री असले तरी सात जिल्ह्यांमध्ये पाटी कोरीच राहिली आहे. अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांना मंत्री पद मिळालेलं नाही. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा मंत्रीपद मिळालेले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT