Ambadas Danve-CM Fadnavis-Dhananjay Munde News Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची ताकद 'बाहुबली' देवेंद्र फडणवीसांच्या बाहुत नाही!

The question arises whether Chief Minister Devendra Fadnavis has the authority to accept the resignation of Dhananjay Munde. : गेल्या दोन महिन्यापासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणात मोठी नावे समोर आल्याने आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जाते.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिने झाले. कृष्णा आंधळे नावाराचा आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज नव्या घोटाळ्याचे आरोप होत आहेत, असे असताना त्यांच्या राजीनामा का घेतला जात नाही? की ती ताकद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाहुत नाही, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.

गेल्या दोन महिन्यापासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणात मोठी नावे समोर आल्याने आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जाते. वाल्मीक कराडसह अनेक आरोपी या प्रकरणात अटकेत असले तरी कृष्णा आंधळे नावाचा आरोप अजून पोलीसांना सापडत नाहीये. तर (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने विरोधकांनी रान पेटवले असले तरी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार काहीच निर्णय घेत नाहीयेत.

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारला काही प्रश्न विचारत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी होणार? देशमुख कुटुंबियांना न्याय कधी मिळणार? अशी विचारणा केली आहे. किती काळ कळ सोसायची देशमुख कुटुंबीयांनी. आज संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने झाले. त्यानिमित्ताने या सरकारला माझे काही प्रश्न आहेत. कृष्णा आंधळे हा आरोपी अजून पोलीसांना सापडलेला नाही, त्याच्या मुसक्या कधी आवळणार आहात?

या खून प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना परत सीआयडीने आपल्या कोठडीत घेऊन तपास चालवला होता. त्यात काय डेटा रिकव्हर झाला ते लोकांना कळायला हवे ते कधी कळणार? गेल्या कित्येक दिवसापासून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी नियुक्ती करण्याची मागणी समोर आली होती. त्यांच्या या नियुक्तीचे चार ओळींचे पत्र काढायला सरकारला अजून किती महिने लागणार? आहेत, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला आहे.

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे उभ्या जगाला ज्ञात आहे. मग यांच्या संबंधांची चौकशी सरकार कधी करणार आहे? दरदिवशी नवे घोटाळे समोर येत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाहीये तो कधी घेणार? की ती ताकद मुख्यमंत्र्यांच्या बाहुत नाही? असा टोलाही अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा बाहुबली असा उल्लेख भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT