Eknath Shinde toll free decision sarkarnama
महाराष्ट्र

गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! मुंबई-बेंगळुरू अन् मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर फ्री प्रवास, सरकारने घेतला टोलमाफीचा निर्णय

Toll Free For Ganpati Festival 2025 : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने महत्वाचे आणि मोठे निर्णय आधीच घेतले आहेत. आता देखील महत्वाचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत कोकण प्रवास करणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.

  2. मुंबई-गोवा, मुंबई-बेंगळुरू महामार्ग तसेच महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर ही माफी लागू असेल.

  3. या निर्णयामुळे गणेशभक्तांचा कोकण प्रवास अधिक सोपा व कमी खर्चिक होणार आहे.

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात गणेशोत्सवाला गावी जाणाऱ्या प्रवाशांना टोल माफी दिल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरून प्रवास करताना आता टोल द्यावा लागणार नाही. खासगीसह एसटी बसेसना टोलमाफी देण्यात आली आहे.

शिंदे यांनी घोषणा केल्याप्रमाणे कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात टोल माफी असणार आहेत. यासाठी कोकण दर्शन या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार येईल. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.

आता या घोषणेनंतर गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांनी ग्रामीण तसेच शहरी पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागाकडे समन्वय साधून पास घ्यायचा आहे. तसेच या संदर्भात जाहिरात आणि सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देशही शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहने वाहतुकीला प्रवेश बंदी असणार आहे. 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही बंदी असणार आहे. जी अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांसाठी आहे. तसेच गणपती विसर्जन, गौरी गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासाच्या दरम्यानच्या कालावधीत देखील जड वाहतूक बंद राहील.

FAQs :

प्र.१: कोणत्या कालावधीत टोल माफी मिळणार आहे?
उ: २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत टोल माफी लागू असेल.

प्र.२: कोणत्या महामार्गांवर टोल माफी मिळणार आहे?
उ: मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बेंगळुरू महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीच्या रस्त्यांवर.

प्र.३: कोणत्या वाहनांना टोल माफी मिळणार आहे?
उ: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व वाहनांना व एसटी बसेसना टोल माफी मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT