Santosh Bangar, eknath shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Santosh Bangar : हिंगोलीच्या पाणी प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी; बांगर रस्त्यावर उतरणार

Mangesh Mahale

Hingoli News : हिंगोलीच्या कयाधू नदीचे पाणी भुयारी मार्गाने ईसापूर धरणात सोडण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला मराठवाड्यातील शिंदे गटातील आमदाराचा कडाडून विरोध आहे.

सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानंतर या कामाची प्रशासकीय मान्यतादेखील झाली आहे. मात्र, आता राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात सत्तेत असलेले लोकप्रतिनिधीच विरोध करत असल्याने हिंगोलीच्या पाणी प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी पडणार आहे.

शिंदे यांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1450 कोटी रुपयांचा निधी खर्च करून हिंगोलीच्या कयाधू नदीमधील पाणी ईसापूर धरणामार्गे नांदेडला पळविण्याचा निर्णय झाला आहे. त्यावरून संतोष बांगर हे विरोधकांसह राज्य सरकारच्या विरोधात संतापले आहेत.

या आधीदेखील सरकारच्या वतीने हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात सापळी धरणाला मान्यता देऊन हिंगोलीचे पाणी पळविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आपण स्वतः सापळी धरण रद्द करण्यासाठी प्रयत्न केले.

मात्र, त्यानंतर लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून हिंगोली हिंगोलीच्या कयाधू नदीचे पाणी भुयारी मार्गाने ईसापूर धरणात सोडण्याचा घेतलेला निर्णय हा हिंगोली जिल्ह्याला वाळवंट करणारा असल्याने हे काम आम्ही होऊ देणार नसल्याचे सांगत राज्य सरकारच्या या निर्णयाला बांगर यांनी विरोध केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT