कॅशबॉम्ब आरोपांनंतर आता महेंद्र दळवींनी चित्रलेखा पाटील यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
दळवींनी सुपारी व ड्रग्सचा उल्लेख केल्याने वाद अधिक तीव्र झाला आहे.
या आरोपांमुळे रायगडसह संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Raigad News : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी त्यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अंबादास दानवे यांनी आरोप करत 'कॅशबॉम्ब' टाकला होता. यामुळे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात खळबळ उडाली होती. यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत शेकापच्या महिला नेत्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावलेंविरोधात 'कॅशबॉम्ब'टाकला होता. यावरून आमदार महेंद्र दळवी यांनी चित्रलेखा पाटील यांच्यावर निषाणा साधला आहे. त्यांनी, चित्रलेखा पाटील या सुपारी घेवून बालिश बुद्धीने बोलत असतात असे म्हणत ड्रग्सचाही उल्लेख केला आहे. यामुळे आता रायगडसह राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांना लक्ष करत शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी कॅशबाँब फोडला होता. या आरोपांना प्रत्योत्तर देताना दळवी यांची चित्रलेखा पाटील यांचा समाचार घेतला. चित्रलेखा पाटील या ड्रग्स घेऊन तर बोलत नाहीत ना असा गंभीर सवाल दळवी यांनी उपस्थित केला आहे. चित्रलेखा पाटील यांचं अख्खं कुटुंब आपण हद्दपार केल असून त्यांच्या कुटुंबाचे दोन पार्ट झालेत. एक वन आणि टू असा पलटवार देखील दळवी यांनी केला आहे.
त्याचबरोबर सध्या त्यांच्या कुटुंबातील पार्ट वन हा शेकापबरोबर असला तरीही पार्ट टू भाजपबरोबर गेला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला अक्कट शिकवायची गरज नाही. त्या कोण आम्हाला अक्कल शिकवणार. त्यांना सुपारी घेऊन बालिश बुद्धीने वक्तव्य करणे शोभत नाही, त्यांना मी पराभूत केलं असून त्यांची जनमानसात त्यांची किंमत शून्य आहे. मला तर वाटतं की त्या ड्रग्स घेऊन तर बोलत नाहीत ना? असा सवाल करत याचे उत्तर आधी त्यांनी द्यावं असेही आमदार महेंद्र दळवी यांनी सुनावलं आहे.
याआधी देखील यावरून दळवी यांनी अंबादास दानवे यांना खुले आव्हान देत, या आरोपांचे कोणतेही खरे पुरावे असतील तर ते जनतेसमोर आणावेत. त्यात अंशतः सत्यता जरी आढळली तरी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हणत दानवे ब्लॅकमेल करत असल्याचा दावा केला होता. यानंतर त्यांनी याप्रकरणानंतर दानवे यांना नोटीसही पाठवली होती.
1. ‘कॅशबॉम्ब’ प्रकरण नेमकं काय आहे?
➡️ विधीमंडळ अधिवेशनात विविध नेत्यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्याने हे प्रकरण चर्चेत आले.
2. महेंद्र दळवी यांनी कोणावर आरोप केले?
➡️ त्यांनी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
3. या वादाची सुरुवात कशी झाली?
➡️ अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवी यांच्यावर कॅशबॉम्ब टाकल्यानंतर हा वाद वाढत गेला.
4. या प्रकरणात भरत गोगावले यांचा उल्लेख का झाला?
➡️ चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर कॅशबॉम्ब टाकला होता.
5. या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ रायगड आणि राज्यात सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.