रायगड जिल्हा परिषदेतील 4 कोटी 12 लाखांच्या आर्थिक अपहार प्रकरणात आरोपी कर्मचारी ज्योतिराम वरुडे यांनी आत्महत्या केली आहे.
सहआरोपींनी टाकलेल्या दबावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप पत्नी अश्विनी वरुडे यांनी तक्रारीत केला आहे.
अलिबाग पोलिस ठाण्यात सहआरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Raigad News : रायगड जिल्हा परिषदेतील महिला व बाल विकास विभागात 4 कोटी 12 लाखांचा आर्थिक अपहार उघडकीस आला होता. यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण आले असून या प्रकरणातील आरोपी कर्मचारी ज्योतिराम पांडुरंग वरुडे याने आत्महत्या केली आहे. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी घडली असून त्यांनी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली आहे. यानंतर सापडलेल्या चिठ्ठीत धक्कादायक माहिती समोर आली असून दोघांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रायगड जिल्हा परिषदेतील महिला व बाल विकास विभागात 4 कोटी 12 लाखांचा आर्थिक अपहार झाल्याची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणी ज्योतिराम वरुडे, नाना कोरडे आणि महेश मांडवकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात ज्योतिराम वरुडे दबावाखाली होते. तशी चर्चा देखील परीसरात सुरू होती. दरम्यान ते 20 ऑक्टोबर रोजी, अलिबागमधील विद्यानगर येथे आपल्या मेव्हण्याच्या घरी गेले होते. ते तेथे सहआरोपींना भेटण्यासाठी आले असल्याचे आता समोर आले आहे.
त्यांनी मेव्हण्याच्या घरी टोकाचे पाऊल उचलत विषारी द्रव्य सेवन केले. त्यामुळे त्यांना उलटी होऊ लागली व नातेवाईकांनी तातडीने अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच दीपावलीच्या दिवशी सोमवारी (दि. 20) सकाळी 6:30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
आता त्यांची पत्नी अश्विनी वरुडे यांनी आत्महत्येनंतर सापडलेल्या चिठ्ठी पोलिसांत देत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सहआरोपी नाना एकनाथ कोरडे व महेश गोपीनाथ मांडवकर यांचे नाव घेत आरोप केले आहेत. या दोघांनी सातत्याने मानसिक त्रास व दबाव टाकल्याचा दावा केला आहे. यावरूनच पत्नी अश्विनी वरुडे यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आता जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली असून कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत आता संशयाची सुई फिरू लागल्यायने चर्चा सुरू झाली आहे. या आत्महत्येमुळे अपहार प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून जोर धरू लागली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी अश्विनी वरुडे यांचा मोबाईल नंबर पोलिस DCR मध्ये नोंदवण्यात आलेला नसल्याने आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे आता या प्रकरणात प्रसारमाध्यमे, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित अधिकाऱ्यांपासून फिर्यादी अश्विनी वरुडे यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी का केला? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सहआरोपींचा पाय आणखी खोलात
रायगड जिल्हा परिषदेतील महिला व बाल विकास विभागात 4 कोटी 12 लाखांचा आर्थिक अपहार प्रकरणात नाना एकनाथ कोरडे व महेश गोपीनाथ मांडवकर यांच्यावर आधीच गुन्हा दाकल होता आता ज्योतिराम वरुडे यांच्या आत्महत्येप्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सहआरोपींचा पाय आणखी खोलात गेल्याची जोरदार चर्चा परीसरात जोर धरू लागली आहे.
1️⃣ रायगड जिल्हा परिषद आर्थिक अपहार प्रकरणात किती रकमेचा अपहार झाला?
या प्रकरणात तब्बल 4 कोटी 12 लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप आहे.
2️⃣ आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव काय आहे?
आरोपी कर्मचारी ज्योतिराम पांडुरंग वरुडे यांनी आत्महत्या केली आहे.
3️⃣ आत्महत्येचे कारण काय सांगितले जात आहे?
सहआरोपींनी टाकलेल्या दबावामुळे वरुडे यांनी आत्महत्या केली, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
4️⃣ तक्रार कोठे दाखल करण्यात आली आहे?
ही तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
5️⃣ सहआरोपींवर कोणती कारवाई झाली आहे?
पोलिसांनी सहआरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.