Nitesh Rane, Sanjay Raut sarkarnama
कोकण

Nitesh Rane on Sanjay Raut : मोदींवरील राऊतांच्या टीकेने नितेश राणे भडकले; म्हणाले, तर त्यांना रोज औरंगजेब आठवेल....

Umesh Bambare-Patil

Nitesh Rane News : सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आमदार नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, मोदींची औरंगजेबाशी तुलना करणे म्हणजे देशभरातील नागरिकांचा अपमान करण्यासारखे आहे. पण, जेवढी पंतप्रधान मोदींवर ते टीका करतील तेवढे ते खड्ड्यात जातील. राऊतांनी त्याचे थोबाड बंद केलं नाही, तर त्याच्या मालकाची आणि मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल, की मग रोज औरंगजेब आठवेल, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी राऊत यांना दिला आहे.

नितेश राणे यांनी म्हटले की, संजय राऊत आणि त्याच्या मालकाला औरंगजेबाच्या बाजूला दोन कबरी खोदून घेण्याची घाई लागली आहे. ते जेवढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतील तेवढे ते खड्ड्यात जातील. एकीकडे मालकाच्या मुलाला वाचविण्यासाठी राऊत आणि त्याच्या मालकाची बायको दिल्ली वाऱ्या करत आहेत, आणि पाळलेल्या कुत्र्याच्या माध्यमातून भुंकायला लावून टीका करत आहेत.

आता राऊताने त्याचं थोबाड बंद केलं नाही, तर मालकाची आणि मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल की, मग रोज औरंगजेब आठवेल. नितेश राणे म्हणाले, मोदींची औरंगजेबाशी तुलना करणे म्हणजे देशभरातील नागरिकांचा अपमान करण्यासारखे आहे. जी धार्मिक स्थळं काँग्रेसच्या काळात अंधारात होती. त्यांना उजेडात आणण्याचं काम मोदींनी केलंय. सुपारीबाज राऊताला भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी युती करू नये, म्हणून काँग्रेसने राऊतला सुपारी दिली आहे. मोदींनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी दिला आहे. स्वार्थाचा दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आहेत.

राज ठाकरेंच्या विरोधकांना मिरच्या लागल्या....

राज ठाकरेंचा महायुती समवेत येण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. हिंदुत्वाचा विचार सर्वांना घेऊन भक्कम होत असेल तर राज ठाकरेंना आम्ही घेतलं तर विरोधकांना मिरच्या का लागल्या. तुम्ही वंचित आघाडीला घेता ते चालते का, असा प्रश्न त्यांनी केला. काँग्रेसच्या वाट्याच्या जागाबाबत विचारले असता ते म्हणाले, सांगलीची जागा काँग्रेसने जाहीर करून उद्धव ठाकरेला फाट्यावर मारले आहे. त्याची काय लायकी आहे. हे ही यादी बघून समजत आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत आघाडी भक्कम आहे, असं मला वाटत नाही.

नीलेश लंकेनी अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे, याविषयी विचारले असता नितेश राणे म्हणाले, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्यांना अजितदादांनी उभं केलं, त्यांचीच साथ सोडत असतील तर त्यांच्या भविष्याची चिंता करावी लागेल. महायुतीला एकत्र ठेवण्याचे काम देवेंद्र फडणवीससाहेब करत आहेत. ते असेपर्यंत सर्व काही आलबेल आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोकणातील जागावाटपावर ते म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागा लढविण्याबाबत चर्चा होत आहे. शेवटच्या ४८ तासांत जरी जागा जाहीर झाली तरी महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे. राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणे म्हणाले, राहुल गांधींना किती वेळा लॉन्च करायचं. ते आपल्या पायावर उभे राहणार नाहीत. त्यांची मशीन बंद पडली आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT