Uddhav Thackeray, Narayan Rane
Uddhav Thackeray, Narayan Rane Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचा विषय एका वाक्यात संपावला; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray on Narayan Rane : बारसू येथे प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला स्थानिकांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. तर भाजपकडून या प्रकल्पाची पाठराखण केली जात आहे. या प्रकल्पाच्या समर्थनार्थ शनिवारी (ता. ६) आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चचे आयोजन केले होते. तसेच कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनीही ठाकरे यांच्यावर टीका केली.

महाड येथील शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर (Nitesh Rane) जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, "भोके पडलेली ते टीनपाटे दररोज माझ्यावर टीका करत असतात. भाजपला ते एकावर दोन फ्री मिळाले आहेत. आता सुक्ष्म राणेंची मोठी पंचायत झाली आहे. त्यांना काय सांभाळावे ते कळतच नाही. पोरांना सांभाळायले गेले तर डोक्यावरचा टोप पडतोय. टोप सांभाळायला गेले तर पोरे सुटतात. त्याच्यामुळे सूक्ष्म माणसांवर मोठी जबाबदारी आलेली आहे."

राणे पिता-पुत्र दररोज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत असतात. त्यांचा उल्लेख करून ठाकरे यांनी राणे यांना धारेवर धरले. ठाकरे म्हणाले, "ते दररोज मला वाटेल ते बोलत असतात. त्यांना बोलूद्या, कारण त्याच्यावर त्यांचे पोट चालत आहे. त्यांनी आरोप केला की बारसू येथे माझ्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत. होय, बारसुतील लोक माझे नातेवाईक आहेत. त्यांच्या जमिनी तेथे आहेत. मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय तुम्ही उपऱ्यासाठी लढत आहात."

तत्पुर्वी या सभेत उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही राणे यांचा समाचार घेतला होता. अंधारे म्हणाल्या की, राणे पितापुत्रांना गंभीरपणे घ्यायचे नसते. सूक्ष्ममंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या मुलांना जाहीरपणे उत्तर देण्याची गरज नाही. ते 'सांगितल्या चाकीरीचे आणि दिल्या भाकरीचे' असे त्यांची कामे आहेत. ते काम त्यांचे चोखपणे पार पाडत आहे. त्याच्यावर त्यांचे पोट चालत आहे. "

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यासह देशात सरकार बदलण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "निवडणुका आल्या की घोषणांचा पाऊस पडतो. जुमल्यांना फसून लोक आपले सोन्यासारखे मत देतात. पुढे दिलेली आश्वासने विसरण्यासाठी समजात तेढ निर्माण केला जातो. दंगली घडविल्या जातात. भाजप महागाई, बेराजगारीवर न बोलता फक्त हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरते. तेच कर्नाटकमध्ये होत आहे. सध्या देशात दडपशाही सुरू आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे जात आहे. आता २०२४ मध्ये भाजप निवडून आले तर ही शेवटची निवडणूक ठरेल. त्यामुळे 'अब की बार भाजप तडीपार' केले पाहिजे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT