भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांना स्पष्ट इशारा दिला की ते अजून किमान १५ ते २० वर्ष राजकारणातून रिटायर्ड होणार नाहीत.
त्यांनी सांगितले की, "माझा राजकीय प्रवास अजून संपलेला नाही, अजून बरंच काम बाकी आहे."
या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Marathwada Political News : मी राज्य आणि देशाच्या मिळून चारही सभागृहात काम केले आहे. राज्यात दोनवेळा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, लोकसभेवर निवडून गेलो आणि आता राज्यसभेवर आहे. त्यामुळे आता फक्त मार्गदर्शक म्हणून तुमच्यासोबत राहणार आहे. परंतु याचा अर्थ मी राजकारणातून रिटायर्ड होतोयं असा नाही, नाहीतर विरोधकांना आनंद होईल, असा चिमटा भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी काढला.
नांदेड (Nanded) जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला भाजपाकडून सुरवात झाली आहे. अशोक चव्हाण हे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जावून प्रभागांमध्ये प्रचार सभा घेत आहेत. याच दरम्यान केलेल्या भाषणात चव्हाण यांनी विरोधकांवर टीका करतानाच आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. नांदेड जिल्ह्याचा विकास आपल्याला वेगाने करायचा आहे. त्यामुळे मध्ये येणारे राजकीय स्पीड ब्रेकर उखडून फेकावे लागतील. नाहीतर आम्ही काम मंजूर करून आणायची, त्याला त्यांनी विरोध करायचा, कोर्टबाजी करायची याला काही अर्थ नाही.
नेतृत्वावर विश्वास दाखवा आणि आमचे हात बळकट करा, तरच सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. विरोधक येणाऱ्या काळात फेक नरेटीव सेट करण्याचा प्रयत्न करतील, खोटं बोलतील पण त्यांच्या जाळ्यात न अडकता विकासाला महत्व देवून भाजपाला निवडून द्या, असे आवाहन अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी यावेळी केले. मला जर आता निवडणूक लढवायची असती तर मी स्वामी तुमच्या वार्डातून लढलो असतो, पण आता नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अगदी सुरूवातीलाच अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या एका भाषणात जे तुमच्या मनात आहे, तेच माझ्याही मनात आहे, असे सांगत स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर आता त्यांची वाटचाल देखील त्याच मार्गाने सुरू आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यातील जुने वैर पुन्हा उफाळून आले आहे. दोघांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप पाहता दोन्ही नेते एकला चलो रे च्या भूमिकेत आहेत.
दुसरीकडे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनीही अशोक चव्हाण यांच्यावर सातत्याने टीक करत त्यांना रावणाची उपमा दिली होती. नांदेड शहरातील मोक्याच्या जागा बिल्डरांना कोणी विकल्या? असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे महायुतीत निवडणूका लढण्याच्या मानसिकतेत तीनही पक्षांचे नेते नाहीत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात महायुती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जाते.
अशोक चव्हाण यांची तयारी आणि आक्रमक भाषा पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाची सगळी सुत्रं त्यांच्या हाती सोपवण्यात आल्याचे स्पष्ट होते. प्रचाराला सुरूवात करत चव्हाणा यांनी मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांनाच टारगेट केल्याचे दिसून येते. मी रिटायर्ड होणार नाही, असे स्पष्ट करत नांदेडच्या राजकारणात आपण पंधरा-वीस वर्ष सक्रीयच असणार हे सांगत त्यांनी विरोधकांनाही संदेश दिला आहे.
1. अशोक चव्हाण यांनी काय विधान केले?
त्यांनी सांगितले की ते पुढील १५-२० वर्ष राजकारणातून निवृत्त होणार नाहीत.
2. हे वक्तव्य कुठे केले गेले?
अशोक चव्हाण यांनी हे विधान एका स्थानिक कार्यक्रमात केले.
3. विरोधकांनी या विधानावर काय प्रतिक्रिया दिली?
काही विरोधकांनी हे विधान "राजकीय आत्मविश्वासाचा इशारा" म्हटले आहे.
4. अशोक चव्हाण सध्या कोणत्या पक्षात आहेत?
ते भाजपाचे खासदार तथा वरिष्ठ नेते आहेत.
5. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात काय चर्चा सुरू आहे?
चव्हाण पुन्हा सक्रिय राजकारणात जोरदार भूमिका घेणार अशी चर्चा सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.