BJP News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी भाजप-शिवसेनेमध्ये अडीच-अडीच वर्षाचा फाॅर्म्युला ठरला होता. तीन दिवसानंतर अचानक काय झाले माहित नाही? शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या पुरस्कृत सदस्यांसह अपक्ष आणि उद्धव ठाकरे सेनेच्या सदस्यांना आम्ही भाजपसोबत जाणार नाही, स्वतंत्र सत्ता स्थापन करणार, असे सांगणे सुरू केले. एवढेच नाही तर काही सदस्यांना गोव्याला घेऊन गेले, माझ्याकडे या सगळ्यांचे बोर्डिंग पास आहे, असा दावा करत मंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
आजही ते आमच्या सोबत आले असते तर त्यांना ठरल्याप्रमाणे उपाध्यक्ष पद दिले असते. पण त्यांच्या नेत्यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही, की फोन केला नाही. शिवसेनेच्या (Shivsena) मनात वेगळेचं सुरू असल्याचे समजल्यानंतर आम्हीही जुळवाजुळव केली आणि आम्हाला 32 सदस्यांना पाठिंबा दिल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेतील दोन आमदारांना आपल्या नातेवाईकांना अध्यक्ष करायचे होते, म्हणून त्यांनीच युती ऐवजी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व अपक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. आमचेही सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला, असा थेट हल्ला सावे यांनी शिवसेनेवर चढवला.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपचे (BJP) अविनाश गलांडे, जितेंद्र जैस्वाल यांची अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाल्यानंतर अतुल सावे यांनी माध्यमांना घडलेल्या घडामोडींचा घटनाक्रम सांगीतला. मुंबईत शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत पहिले अडीच वर्ष भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि अडीच वर्षांनी भाजपाच उपाध्यक्ष आणि शिवसेनेचा अध्यक्ष करण्याचे ठरले होते. पण नंतर शिवसेनेतील नेत्यांनी वेगळा विचार करून आमच्याशी कुठलाही संपर्क ठेवला नाही.
शिवसेनेतील दोन आमदारांनी आपल्या मुलाला, पुतण्याला अध्यक्ष करण्यासाठी वेगळ्या हालचाली सुरू केल्यामुळे आम्हालाही गणित जुळवावी लागली आणि आम्ही ती जुळवली. शिवसेनेने आमच्यावर केसाने गळा कापल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. उलट त्यांनीच भाजपासोबत दगाबाजी केली. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत आहे. शिवसेना नाही, पण याचा राज्याच्या युतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत.
सत्तारांनी मतदारसंघ सांभाळावा
अब्दुल सत्तार यांनी भाजपने आमचा केसाने गळा कापल्याचा आरोप केला, यावर अतुल सावे यांनी तुम्हाला मुलाला अध्यक्ष करायचे होते, त्यासाठीच तुम्ही शिवसेनेला सोबत घेतले, त्यांना गोव्याला नेले. तुम्ही आता शांत बसा आणि मतदार संघाकडे लक्ष द्या. भाजप आता तिथे पन्नास टक्के जागा जिंकला आहे, असा टोलाही अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.