Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis, Santosh Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Case : "मुख्यमंत्रीसाहेब नंतर पश्चात्ताप होईल..."; संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

Manoj Jarange Patil On Santosh Deshmukh Murder Case : "घटना घडून इतके दिवस झाले आरोपीला पकडलं जात नाही. आरोपीला वाचवणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. खरंतर आरोपींना वाचवणाऱ्यांना तुम्ही सज्जड दम दिला पाहिजे. संध्याकाळपर्यंत आरोपी हजर झाले पाहिजे. नाही तर तुझी खैर नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे."

Jagdish Patil

Beed News, 28 Dec : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अजून पकडण्यात आलेलं नाही. शिवाय या प्रकरणाचा सुत्रधार म्हणून विरोधक वाल्मिक कराड याच नाव घेत आहेत. तो देखील अद्याप फरार आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आरोपींना अटक न केल्याचा निषेध करण्यासाठी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) देखील सहभागी होणार आहेत. तर या मोर्चाला सुरूवात होण्याआधीच जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपींना पाठिशी घालणाऱ्यांना पाठी घालू नका अन्यथा पश्चात्ताप होईल, असा इशारा दिला आहे.

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "घटना घडून इतके दिवस झाले आरोपीला पकडलं जात नाही. आरोपीला वाचवणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. खरंतर आरोपींना वाचवणाऱ्यांना तुम्ही सज्जड दम दिला पाहिजे. संध्याकाळपर्यंत आरोपी हजर झाले पाहिजे. नाही तर तुझी खैर नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. मात्र ते तसं करत नाहीत. देशमुख यांचा खून झाला. त्याचं कुणाला काही पडलेलं नाही.

तुमच्या जवळच्या व्यक्तीचा खून झाला असता तर तुम्हाला झोप लागली असती का? मग तुम्हाला देशमुख यांच्या पत्नीचा, लेकीचा आईचा भयंकर आक्रोश ऐकू का येत नाही? असा सवाल करत फडणवीसांवर निशाणा साधला. तसंच तुम्ही आरोपींना पकडत नाही तर वातावरण शांत होण्याची वाट पाहात आहात. तुम्हीच आरोपींना पकडून ठेवलं की काय असं वाटतं आहे.

पण आम्ही वातावरण थंड होऊ देणार नाही. हे वातावरण आता राज्यभर पसरेल. प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चे काढणार असल्याचंही जरांगे म्हणाले. बीडमध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या गुन्हेगारांचा बिमोड करायचं काम तुमचं आहे. पण तुम्हीच त्यांना सांभाळताना दिसत आहात. मुख्यमंत्री साहेब तुम्ही या लोकांना सांभाळू नका, पाठीशी घालू नका. नाही तर तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल, अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT