Sharad Pawar-MLA Prashant Bamb News Sarkarnama
मराठवाडा

Prashant Bamb On Sharad Pawar : 'दिल्लीत दोन लोक भेटायला आले होते' या प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा! आमदार प्रशांत बंब यांची मागणी..

Prashant Bamb has demanded an investigation against Sharad Pawar over his recent statement : लोकसभेत असाच प्रकार तर नसेल केला, आता सौदा जमला नसेल, असा चिमटा बंब यांनी काढला. राहुल गांधी, शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांची नोंद होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांची चौकशी करावी.

Jagdish Pansare

Maharashtra Politics News : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादीत घोळ असल्याचा दावा करत गंभीर आरोप केले. याला दुजोरा देणारे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत राज्यात खळबळ उडवून दिली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन लोक आपल्याला भेटायला आले होते. या लोकांनी आपल्याला 160 जागा जिंकवून देण्याची खात्री दिली होती, असा दावा शरद पवारांनी केला. त्यांच्या या दाव्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.

भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यप्रकरणात त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. शरद पवार यांच्या दाव्यावर भाष्य करताना त्यांनी ही मागणी केली आहे. लोकसभेत असाच प्रकार तर झाला नसेल ना? असा टोलाही बंब यांनी यावरून लगावला आहे. 60 वर्ष राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना लोक आठवत नाहीत हे अनाकलनीय असल्याचे बंब म्हणाले.

अनेक वर्षानंतर गावात गेल्यावर लोकांना नावानिशी ओळखणाऱ्या शरद पवारांना (Sharad Pawar) भेटायला आलेल्या दोन व्यक्तींची नावं आठवत नाहीत. हे दोन लोक देशद्रोही आहेत, माझा विश्वास नाही की त्यांना त्यांचे नाव आणि पत्ता आठवत नसेल. लोकसभेत असाच प्रकार तर नसेल केला, आता सौदा जमला नसेल, असा चिमटा काढतानाच राहुल गांधी, शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांची नोंद होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी करतानाच ती वरिष्ठ पातळीवर व्हावी, असेही बंब यांनी म्हटले आहे.

विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे, त्यांनी जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं.

हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारू, असे आम्ही ठरवल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT