Arjun khotkar- Kailas Gorntyal Crisis News Sarkarnama
मराठवाडा

Arjun Khotkar-Kailas Gorantyal : गोरंट्याल-खोतकर संघर्षाचा भडका! एकमेकांच्या वस्त्रहरणाने राजकारण तापले

Kailas Gorantyal’s recent entry into the BJP has intensified political tensions within the Mahayuti alliance : दोन पक्षांमधील वाढता संघर्ष पाहता हा घाट स्वबळासाठी घातला जात आहे का? असा प्रश्न पडतो. गोरंट्याल यांनी महापालिका निवडणुक स्वबळावर लढण्याचा व महापौर बसवण्याचा इरादा बोलून दाखवला आहे.

Jagdish Pansare

Jalna Politics News : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आणि त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी व राजकीय विरोधक आमदार अर्जुन खोतकर यांचा पारा चढला. महायुती असल्याने खोतकर भाजपावरचा सगळा राग सध्या कैलास गोरंट्याल यांच्यावर काढताना दिसत आहेत. एका वृत्तवाहिनीवर या दोघांनी एकमेकांचे जे वस्त्रहरण केले, ते पाहता जालन्याचा राजकारणात येणाऱ्या काळात मोठा भडका उडण्याची शक्यता आहे.

भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांना पक्षात घेत अर्जुन खोतकर यांची कोंडी केली आहे. भामटा, खोटारडा अशी विशेषणं खोतकरांनी वापरली तर, तू रडून शिवसेनेत प्रवेश केला, शिंदेंच्या पाया पडला, तू भ्रष्टाचार केला असे आरोप गोरंट्याल यांनी खोतकरांवर केले. एकूणच आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीतील या दोन नेत्यांमध्ये मोठी खडाजंगी होणार हे वेगळे सांगायला नको.

शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्यानंतर गद्दारीचा आरोप जिव्हारी लागल्याने अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्या भाजपा प्रवेशानंतर पलटवार केला. आमच्यावर पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला, मग आता तू किती खोके घेतले? असा हल्ला खोतकरांनी चढवला. त्याला मी तूला सोडणार नाही, आता बघच, असे प्रतिआव्हान गोरंट्याल यांनी दिले. या सगळ्या वादावादीवर महायुतीतील प्रमुख नेत्यांनी सध्या तरी मौन धारण केले आहे.

महायुतीतील दोन पक्षांमधील वाढता संघर्ष पाहता हा सगळा घाट स्वबळासाठी घातला जात आहे का? असा प्रश्न देखील पडतो. गोरंट्याल यांनी तर भाजपामध्ये प्रवेश करताच महापालिका निवडणुक स्वबळावर लढण्याचा इरादा स्पष्ट करत महापौर बसवणारच, असे जाहीर केले आहे. यावर गोरंट्याल याला अधिकार कोणी दिले? स्वबळावर लढायचे की युतीत? हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे ठरवतील, असे सांगत खोतकरांनी तू साधा कार्यकर्ता आहे, याची जाणीव गोरंट्याल यांना करून दिली.

काँग्रेस म्हणते, फरक पडत नाही..

काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी नुकतेच गोरंट्याल यांच्या पक्षांतरावर भाष्य केले. महायुतीला त्यांची गरज नव्हती, गोरंट्याल यांना त्यांची गरज होती, असा चिमटा काढतानाच त्यांनी पक्ष सोडल्याने आमचे पदाधिकारी आता मोकळा श्वास घेत असल्याचे काळे म्हणाले. जालना काँग्रेसचे नेतृत्व कैलास गोरंट्याल यांना सोपवण्यात आले होते. सगळे निर्णय तेच घेत होते. त्यामुळे सहाजिकच थोडा फरक पडेल. पण आम्ही पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नवी फळी निर्माण करू आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पुन्हा उभारी घेऊ, असे काळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT