मराठवाडा

Omraje Nimbalkar News : "खेकडा मंत्री, बॉयलर कोंबडीचे अंडे अन्...", ओमराजेंची सावंतांवर घणाघाती टीका

Akshay Sabale

Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील ( Dharashiv Lok Sabha Election 2024 ) यंदाची निवडणूक यावेळीही नात्यातील लढाईच ठरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह 31 उमेदवारांच्या लढाईत सध्या तरी निंबाळकर विरुद्ध पाटील, अशी लढाई दिसूत येत आहे. पण, या निवडणुकीत पुन्हा स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बार्शीत रविवारी, 28 एप्रिलला ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली होता. याला ओमराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

तानाजी सावंत काय म्हणाले होते?

"माजी खासदारांना ( ओमराजे निंबाळकर ) विकासासाठी, मोदींसाठी आणि सत्तेत आपला लोकप्रतिनिधी असावा म्हणून निवडून आणलं. 2009 पासून आजपर्यंत त्यांच्या ( ओमराजे निंबाळकर ) भाषणाची सुरुवात माझा बाप मारला, माझा बाप मारला, अशी होते. अरं काय लावलंय हे? भावनेच्या आहारी जाऊन 2009 मध्ये जनतेनं एकदा आमदार केलं. त्याच जनतेनं 2014 मध्ये घरी बसवलं. एक रुपयाचा विकास केला ना एक रुपयांची कुणाला मदत केली. भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही. धाराशिवमध्ये फक्त विकासाची भाषा चालते," असं तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी म्हटलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"कृपा करून माझ्या वडिलांबाबत बोलू नका"

यावर सोमवारी, 29 एप्रिलला बोलताना ओमराजे निंबाळकर ( Omraje Nimbalkar ) यांनी तानाजी सावंत यांची 'बॉयलर कोंबडीचे अंडे' आणि 'जर्शी गाईच्या वासरा'शी तुलना करत समाचार घेतला आहे. "खेकडा मंत्री काहीही बोलत आहेत. बॉयलर कोंबडीच्या अंड्याला बाप असतो का? जर्शी गाईच्या वासराला बाप असतो का? अशी बॉयरल कोंबडीची अंडी आणि जर्शी गाईचं वासरू माझ्या वडिलांबद्दल बोलत आहेत. पण, तुम्ही कुणाच्या आणि मी कुणाच्या पोटी जन्म घेतलाय हे मला माहितीय. कृपा करून माझ्या वडिलांबाबत बोलू नका," असा इशारा ओमराजे यांनी तानाजी सावंत यांना दिला आहे.

"हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावं"

"माझ्या वडिलांच्या हत्येचं राजकारण मी करतोय, असं त्यांचं मत आहे. या निवडणुकीत मी वडिलांचा विषय एकदा तरी काढला का? माझ्या वडिलांची हत्या झाली, ही खोटी गोष्ट आहे का? हत्येप्रकरणाची सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खेडका मंत्र्यांच्या हातात यंत्रणा आहे. त्यामुळे हे हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावं. मात्र, चालवलं जाणार नाही. कारण, दोषी सापडणार, हे माहिती आहे. रोज तारखा वाढवून घेतल्या जात आहेत. 2006 पासून आतापर्यंत फक्त तारखा पुढं ढकलल्या जात आहेत. केंद्रात आणि राज्यातील सत्ता तुमच्या ताब्यात आहे. एक महिन्यात 'दूध का दूध', 'पाणी का पाणी' करावं," असं आव्हान ओमराजे यांनी देवेंद्र फडणवीस आणि तानाजी सावंत यांना दिलं आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT