Narendra Modi sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election : इंडिया आघाडी सत्तेत आली तर 'मिशन कॅन्सल', पंतप्रधान मोदींनी सांगितला 'इंडी'चा प्लॅन

Roshan More

Loksabha Election : बीड लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्या प्रचारासाठी आज (मंगळवार) जाहीर सभा घेतली. पहिल्या दोन टप्प्यात इंडिया आघाडीचा सुपडा साफ झाल्याचे सांगत तिसरा टप्पा संपता इंडिया आघाडीच्या सर्व आशा संपल्या आहेत. मात्र, जर इंडिया आघाडी सत्तेत आली तर ते 'मिशन कॅन्सल' राबवतील, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.

इंडिया आघाडीचा India Aghadi उल्लेख 'इंडी' आघाडी करताना मोदी म्हणाले, 'इंडी आघाडी सत्तेत आली तर ते मिशन कॅन्सल राबवतील. कलम 370 मोदींनी Narendra Modi आणले होते. तो निर्णय रद्द करतील. ज्या स्कीम आणल्या त्या हटवतील, तीन तलाकचा कायदा, मोदी किसान सन्मान योजना, मोफत राशन योजना ते कॅन्सल करतील.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम मंदिर कॅन्सल करतील

राम मंदिराला काँग्रेसचा विरोध होता. म्हणूनच राम मंदिराच्या बाजुने येणारा निर्णय बदलण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक बोलवली होती, असा दावा मोदींनी केला. जर इंडी सरकार सत्तेत आले तर ते राम मंदिराचा सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय देखील ते कॅन्सल करतील, असे मोदी म्हणाले.

मुस्लिमांना आरक्षण

काँग्रेसने मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण दिले आहे. संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास विरोध केला होता. मात्र, काँग्रेस दलित, ओबीसींचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देणार आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT