Modi on India Aghadi : इंडिया आघाडीचा पहिल्या दोन टप्प्यांतच पत्ता गूल झालाय; मोदींची गुगली

Solapur Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 108 जागांवर मतदान झाले आहे, तर दुसऱ्या टप्यात 88 जागांवर मतदान झाले आहे. या 196 जागांमध्ये इंडिया आघाडी मागं पडली आहे, असा दावा मोदी यांनी सोलापूरमध्ये बोलताना केला आहे. त्यातून त्यांनी निवडणूक स्ट्रॅटेजी करत विरोधकांना हतबल करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
Modi on India Aghadi : इंडिया आघाडीचा पहिल्या दोन टप्प्यांतच पत्ता गूल झालाय; मोदींची गुगली

Solapur, 29 April : विद्यमान लोकसभा निवडणुकीत तुम्ही आगामी पाच वर्षांतील गॅरंटीला निवडणार आहात. दुसऱ्या बाजूला 2014 च्या पूर्वी देशाला भ्रष्टाचार, कुशासन आणि दहशतवादाच्या खाईत लोटणारे लोक आहेत. आपला इतिहास कलंकित असूनही काँग्रेस पुन्हा एकदा देशाची सत्ता हाती घेण्याचे स्वप्न पाहत आहे. पण, त्यांना अंदाजच नाही की, निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतच इंडिया आघाडीचा पत्ता गूल झाला आहे, अशा गुगली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (ता. 29 एप्रिल) सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Modi on India Aghadi : इंडिया आघाडीचा पहिल्या दोन टप्प्यांतच पत्ता गूल झालाय; मोदींची गुगली
Modi Solapur Tour : आमच्या पूर्वजांकडून पाप झाले असेल, पण माझ्यासाठी ही प्रायश्चित घेण्याची वेळ; मोदी असं का म्हणाले?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 108 जागांवर मतदान झाले आहे, तर दुसऱ्या टप्यात 88 जागांवर मतदान झाले आहे. या 196 जागांमध्ये इंडिया आघाडी (India Alliance) मागं पडली आहे, असा दावा मोदी यांनी सोलापूरमध्ये (Solapur Lok Sabha Constituency) बोलताना केला आहे. त्यातून त्यांनी निवडणूक स्ट्रॅटेजी करत विरोधकांना हतबल करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, तुमचा हा सेवक डोकं झुकवून तुमच्याकडे येतो आहे. गेली दहा वर्षे तुम्ही मला पारखून पाहिले आहे. माझे प्रत्येक पाऊल तुम्ही पाहिले आहे. माझ्या एक एका शब्दाला तुम्ही जोखून पाहिलं आहे. त्यामुळे मोदींना तुम्ही आता चांगलेच ओळखता. दुसरीकडे इंडिया आघाडीकडे नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरू आहे. ज्यांच्याकडे चेहरा नाही, ज्यांचं नाव नाही, त्यांच्याकडे एवढा मोठा देश दिला जाऊ शकतो का. सत्ता मिळविण्यासाठी ते देशात विभाजनवादी भूमिका घेऊ शकतात.

Modi on India Aghadi : इंडिया आघाडीचा पहिल्या दोन टप्प्यांतच पत्ता गूल झालाय; मोदींची गुगली
Narendra Modi News: सोलापूरकरांचे आशीर्वाद मागण्यासाठी आलोय; पीएम मोदींनी घातली भावनिक साद

इंडिया आघाडीवाले पाच वर्षांसाठी पाच पंतप्रधान असा फॉर्म्युला घेऊन आले आहेत. प्रत्येक वर्षाला एक पंतप्रधान, देशाचा खजिना जेवढा पाहिजे तेवढा लुटतील. प्रत्येक वर्षी नवा पंतप्रधान देशाला लुटेल. नकली शिवसेनावाले म्हणतात की, आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक उमेदवार आहेत. त्यांच्या एका बोलघेवड्या नेत्याने तर सांगितले की, आम्ही एका वर्षात चार पंतप्रधान केले, तर त्यात काय वावगं आहे. पाच वर्षांत पाच पंतप्रधान असतील, तर एवढा मोठा देश चालू शकेल का. त्या दिशेने आम्ही देश कधीही जाऊ शकणार नाही. सत्ता मिळविण्यासाठी आता त्यांच्याकडे हाच एक उपाय राहिला आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

R

Modi on India Aghadi : इंडिया आघाडीचा पहिल्या दोन टप्प्यांतच पत्ता गूल झालाय; मोदींची गुगली
Devendra Fadnavis : मोहिते पाटील फोडल्याचा फडणवीसांना एवढा राग...? मग ज्यांचे पक्ष फोडले त्यांचे काय...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com