Anjali Damania, Dhananjay Munde, Namdev Shastri Sarkarnama
मराठवाडा

Anjali Damania : महंत नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण का केली? अंजली दमानियांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...

Namdev Shastri Supports Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडशी जवळीक असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असतानाच महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडेंची पाठराखण केली आहे.

Jagdish Patil

Beed News, 31 Jan : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडशी जवळीक असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असतानाच महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडेंची पाठराखण केली आहे.

धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा असून मुंडे गुन्हेगार नाहीत, असं नामदेव शास्त्रींनी म्हटलं आहे. मात्र, नामदेव शास्त्री यांनी मुंडेंची पाठराखण करताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "भगवान गड हे पवित्र ठिकाण आहे. या गडावरून राजकारणावर बोलण्याची गरज नव्हती. नामदेवशास्त्रींना या सगळ्या प्रकरणाची माहिती नसल्यामुळे ते बोलले असतील", असं दमानिया म्हणाल्या.

नेमकं प्रकरण काय?

राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी (ता.30) भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी मुंडेंनी आपली बाजू त्यांच्याजवळ मांडली. त्यानंतर आज नामदेव शास्त्री (Namdev Shastri ) यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा असल्याचं जाहीर केलं.

तसंच धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही किंवा ते गुन्हेगार नाहीत. या सर्व प्रकरणाचा भयंकर मोठा परिणाम वारकरी सांप्रदायावर देखील झाला. मागील अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंची मिडियावर ट्रायल झाल्याचं म्हणत शास्त्रींनी म्हटलं. त्यावर अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आक्षेप घेत त्यांना धनंजय मुंडेंची दुसरी बाजू माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

नामदेव शास्त्रींच्या पत्रकार परिषदेनंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या, भगवान गड हे आपल्या सर्वांसाठी एक पवित्र स्थान असून अशा ठिकाणाहून एखाद्या राजकारण्याची पाठराखण केल्याचं पाहून मला वाईट वाटलं. आपण कोणीही असो किंवा धनंजय मुंडे देखील ज्यावेळी मंदिरात जातात. तिथलं आपलं वागणं वेगळं असतं. त्यामुळे नामदेव शास्त्रींनी त्यांचं ते वागणं बघितलं असेल.

पण त्यांची दुसरी बाजू त्यांना कदाचित माहीत नसल्यामुळे त्यांनी मुंडेंची पाठराखण केली असावी. शिवाय या प्रकरणाची माहिती तुम्हाला नसेल तर मी तुमच्यापर्यंत सर्व कागदपत्र पोहोचवेन. मुंडेंविरोधात बोलणारे जे लोक आहेत ते कोणत्याही आकसापोटी बोलत नाहीत. जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवत आहेत. राजकारण हे वेगळं असतं. त्यामुळे त्यांनी पवित्र भगवान गडावरुन अशी भूमिका घ्यायला नको होती, असं म्हणत दमानिया यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT