Manoj Jarange  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Live Update: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय; राज्य सरकारकडे 'या' पाच अटींची केली मागणी

Ganesh Thombare

Jalna News: गेल्या १५ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. मात्र, या काळातदेखील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

उपोषण मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडून अनेकदा मनधरणी करण्यात आली. यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सध्या तरी आंदोलन शिथिल करण्याचा निर्णय घेत राज्य सरकारला पाच अटी घातल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या या अटींवर सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावात उपोषणाला बसलेले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी सरकारकडे काही अटी ठेवल्या आहेत.

जरांगे पाटलांनी सरकारसमोर कोणत्या अटी ठेवल्या ?

- अहवाल कसाही आला तरीदेखील मराठ्यांना ३१ व्या दिवशी प्रमाणपत्र राज्य सरकारने द्यावे.

- मराठा आंदोलकांवर राज्यभरात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.

- लाठीचार्ज केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.

- उपोषण सोडताना राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच दोन्ही राजे आले पाहिजेत.

- राज्य सरकार व मराठा समाज यांच्यामध्ये उदयनराजे भोसले व संभाजीराजे छत्रपती हे दोन राजे हवेत. यांच्या वतीने बाँडवर लिहून द्या, त्यानंतर मी उपोषण सोडतो, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT