Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation:...अन्यथा जिवंत समाधी घेणार; शेतकरी नेते विनायकराव पाटलांचा सरकारला इशारा

अविनाश काळे

Umarga News: मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

यातच काही नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देखील दिले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत असतानाच आता शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी सरकारला सूचक इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली नाही तर शुक्रवारी सायंकाळी जिवंत समाधी घेण्याचा इशारा विनायकराव पाटील यांनी दिला आहे. पाटील यांनी कवठा गावात सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे.

"मनोज जरांगे पाटील आमचा आत्मा आहे, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. हे मला सहन होत नाही. शुक्रवारी दुपारपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा सांयकाळी जिवंत समाधी घेणार आहे. तीन दिवसांपासून पाणी घेतले नाही आणि घेणारही नाही. प्रशासनाने जबरदस्ती करुन मला उपोषणापासून परावृत्त करु नये", असंही पाटील म्हणाले.

"आरक्षणाचा मुद्दा राजकारणासाठी होऊ नये, गरिब, रोजीरोटीसाठी महाग झालेल्या आणि मुलांच्या शिक्षण, नोकरीसाठी मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. कुणबी प्रमाणपत्राचा निकष फक्त पुरावा असणाऱ्यांनाचा नको, तर तो सरसकट दिला गेला पाहिजे, पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT