Jaidatta Kshirsagar Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation: 'अतिरेक्यांनाही लाजवेल अशा घटना...'; जाळपोळीच्या घटनेवर जयदत्त क्षीरसागरांचा संताप

Ganesh Thombare

Beed News: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे पाटलांनी गुरुवारी मागे घेतले. मात्र, राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेलाच आहे. आंदोलन काळात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. त्यामुळे राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. या आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यात काही हिंसक घटना घडल्या.

यामध्ये माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची जाळपोळ करण्यात आली. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयासह घर पेटवून देण्याची घटना घडली. या घटनेनंतर पहिल्यांदाच जयदत्त क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आतंकी आणि अतिरेक्यांनाही लाजवेल अशा घटना बीडमध्ये घडल्या आहेत, ब्रिटिश आणि निजामकाळातही अशा घटना घडल्या नव्हत्या", असे म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी संताप व्यक्त केला. क्षीरसागर यांनी शुक्रवारी त्यांच्या ऑफिसला भेट देत या हिंसाचाराच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

बीडमधील जाळपोळीच्या घटनेत जयदत्त क्षीरसागरांचे कार्यालय आणि घर पेटवून देण्यात आले होते, यामध्ये त्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. यावर बोलताना क्षीरसागरांनी "लोकांना घरामध्ये कोंडून जाळणे, अशा मानसिकतेच्या लोकांना अटक करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत बीड जिल्ह्यातील घटनासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT